शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

शेतकऱ्यांसोबत धोका; पाणी विकत घेऊन झाडे जगवली, अडीच महिन्यांनंतरही मिरच्या लागेना

By दिपक ढोले  | Updated: July 25, 2023 17:32 IST

शेतकऱ्यांनी उपटून फेकले झाडे; नर्सरीसह कंपनीविरोधात केली तक्रार

भोकरदन : तालुक्यातील तळणी येथे अडीच महिने होऊन झाडांना मिरच्या लागत नसल्याने १५ शेतकऱ्यांनी नर्सरीसह कंपनीविरोधात पंचायत समितीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच नर्सरीसह कंपनीविरोधात कडक कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

भोकरदन तालुक्यातील तळणी येथील पंधरा शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील नवजीवन सिडींग नर्सरीतून प्रिया या वाणाची शिमला मिरचीची रोपे आणली होती. या रोपांची १३ मे २०२३ रोजी लागवड केली होती. त्यावर हजारो रुपये खर्च केले. लागवड केल्यानंतर ४५ दिवसांनंतर फुले लागतात. मात्र अडीच महिने होऊनही फुले, मिरची लागत नसल्याने शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क केला. शेतात येऊन पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली. तरी कंपनीकडून आम्हाला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मिरची लागवड केल्यापासून आतापर्यंत खते, मल्चिंग पेपर, मशागतीसह एकरी १ लाख ५० हजार रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे नर्सरीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला आहे. या निवेदनावर अरुण वाघ, अनिल गायके, संदीप गायके, विठ्ठल गायके, देवीदास वाघ, सुनील गायके, गणपत गायके, राजू गायके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांनी उपटून फेकले झाडेअडीच महिने होऊनही मिरची लागत नसल्याने काही शेतकऱ्यांनी झाडे उपटून फेकली आहेत. शेतकऱ्यांनी उसनवारी आणि सौभाग्यवतीचे दागिने गहाण ठेवून मे महिन्यात शिमला मिरचीची लागवड केली होती. यंदा पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी विकत घेऊन शिमला मिरची जगवली. यातून भरघोस उत्पन्न मिळून कर्जमुक्त व्हावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, झाडांना मिरच्याच लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी