शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांसोबत धोका; पाणी विकत घेऊन झाडे जगवली, अडीच महिन्यांनंतरही मिरच्या लागेना

By दिपक ढोले  | Updated: July 25, 2023 17:32 IST

शेतकऱ्यांनी उपटून फेकले झाडे; नर्सरीसह कंपनीविरोधात केली तक्रार

भोकरदन : तालुक्यातील तळणी येथे अडीच महिने होऊन झाडांना मिरच्या लागत नसल्याने १५ शेतकऱ्यांनी नर्सरीसह कंपनीविरोधात पंचायत समितीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच नर्सरीसह कंपनीविरोधात कडक कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

भोकरदन तालुक्यातील तळणी येथील पंधरा शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील नवजीवन सिडींग नर्सरीतून प्रिया या वाणाची शिमला मिरचीची रोपे आणली होती. या रोपांची १३ मे २०२३ रोजी लागवड केली होती. त्यावर हजारो रुपये खर्च केले. लागवड केल्यानंतर ४५ दिवसांनंतर फुले लागतात. मात्र अडीच महिने होऊनही फुले, मिरची लागत नसल्याने शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क केला. शेतात येऊन पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली. तरी कंपनीकडून आम्हाला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मिरची लागवड केल्यापासून आतापर्यंत खते, मल्चिंग पेपर, मशागतीसह एकरी १ लाख ५० हजार रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे नर्सरीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला आहे. या निवेदनावर अरुण वाघ, अनिल गायके, संदीप गायके, विठ्ठल गायके, देवीदास वाघ, सुनील गायके, गणपत गायके, राजू गायके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांनी उपटून फेकले झाडेअडीच महिने होऊनही मिरची लागत नसल्याने काही शेतकऱ्यांनी झाडे उपटून फेकली आहेत. शेतकऱ्यांनी उसनवारी आणि सौभाग्यवतीचे दागिने गहाण ठेवून मे महिन्यात शिमला मिरचीची लागवड केली होती. यंदा पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी विकत घेऊन शिमला मिरची जगवली. यातून भरघोस उत्पन्न मिळून कर्जमुक्त व्हावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, झाडांना मिरच्याच लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी