शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मालक गेल्यावरही त्यांनी संकटावर मात करून चालविला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

आता तुम्ही म्हणाला हा मुद्दा सांगण्याची तुम्हाला आजच का गरज वाटली. परंतु निमित्तही तसे धीर गंभीर आहे. १९ मार्च ...

आता तुम्ही म्हणाला हा मुद्दा सांगण्याची तुम्हाला आजच का गरज वाटली. परंतु निमित्तही तसे धीर गंभीर आहे. १९ मार्च १९८६ रोजी विदर्भात साहेबराव करपे आणि त्यांची पत्नी मालती करपे या शेतकरी दांपत्याने आत्महत्या केली होती. त्यामुळे हा शेतकरी स्मृतिदिन म्हणून जाहीर नसला तरी तो साजरा केला जातो. काहीजण या दिवशी अन्नत्याग आंदोलनही करतात. या अत्यंत गंभीर आणि तेवढ्याच आव्हात्मक विषयावर येथील संवेदनशील शिक्षिका प्रतिभा श्रीपत यांनी लिहिण्याचे धाडस केले. ‘सूर्योदय’ या कादंबरीतून श्रीपत यांनी बळीराजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने कधीच हिंमत न हारता त्या संकटाशी दोन हात केले. याचे वास्तव थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यात दिवस-दिवस सोबत राहून मांडणी केली आहे.

ही मांडणी म्हणजे शेतकरी पत्नीची कर्मकहाणीच म्हणावी लागेल. श्रीपत व त्यांच्या पतीने सुटीच्या दिवशी रेवगाव, दरेगाव तसेच अन्य गावांमध्ये जाऊन ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी संसाराचा गाढा कशा हिमतीने चालवितात याचे हुबेहूब चित्रण वास्तवपणे मांडले आहे. अनेक संकटांशी सामना करून मुलांचे शिक्षण, शेतीतील कामे ही कधीही बंद पडू दिली नसल्याचे दिसून आल्याचा अनुभव श्रीपत यांनी सांगितला. त्यांनी हे सूर्योदय पुस्तक लिहिताना महिलांना सकारात्मक संदेश देऊन संकटांशी दोन हात करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी तिच्यासह तिच्या संसारात कसा सूर्योदय आणते हे मांडले आहे.

बातम्या वाचून मन हेलावल्यानेच सूर्योदय

शिक्षिका असल्याने समाजाशी आपली नाळ जुळलेली आहे. एक महिला कर्तापुरुष गेल्यावर हतबल होते. परंतु शेतकऱ्याची पत्नी मात्र कधीच हतबल झालेली मला आढळून आली नाही. त्यामुळे इतर महिलांनाही त्यांची प्रेरणा मिळावी यातूनच सूर्योदयची निर्मिती झाली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या वाचल्यावर आपण हेलावून जात असून, त्यातूनच ही संकल्पना सुचली. या पुस्तकाची प्रस्तावना साहित्यिक डॉ. देवकर्ण मदन आणि सहप्रस्तावना ही साहित्यिक रेखा बैजल यांनी लिहिली आहे.

प्रतिभा श्रीपत, शिक्षका, जैन मराठी विद्यालय, जालना