शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मालक गेल्यावरही त्यांनी संकटावर मात करून चालविला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

आता तुम्ही म्हणाला हा मुद्दा सांगण्याची तुम्हाला आजच का गरज वाटली. परंतु निमित्तही तसे धीर गंभीर आहे. १९ मार्च ...

आता तुम्ही म्हणाला हा मुद्दा सांगण्याची तुम्हाला आजच का गरज वाटली. परंतु निमित्तही तसे धीर गंभीर आहे. १९ मार्च १९८६ रोजी विदर्भात साहेबराव करपे आणि त्यांची पत्नी मालती करपे या शेतकरी दांपत्याने आत्महत्या केली होती. त्यामुळे हा शेतकरी स्मृतिदिन म्हणून जाहीर नसला तरी तो साजरा केला जातो. काहीजण या दिवशी अन्नत्याग आंदोलनही करतात. या अत्यंत गंभीर आणि तेवढ्याच आव्हात्मक विषयावर येथील संवेदनशील शिक्षिका प्रतिभा श्रीपत यांनी लिहिण्याचे धाडस केले. ‘सूर्योदय’ या कादंबरीतून श्रीपत यांनी बळीराजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने कधीच हिंमत न हारता त्या संकटाशी दोन हात केले. याचे वास्तव थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यात दिवस-दिवस सोबत राहून मांडणी केली आहे.

ही मांडणी म्हणजे शेतकरी पत्नीची कर्मकहाणीच म्हणावी लागेल. श्रीपत व त्यांच्या पतीने सुटीच्या दिवशी रेवगाव, दरेगाव तसेच अन्य गावांमध्ये जाऊन ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी संसाराचा गाढा कशा हिमतीने चालवितात याचे हुबेहूब चित्रण वास्तवपणे मांडले आहे. अनेक संकटांशी सामना करून मुलांचे शिक्षण, शेतीतील कामे ही कधीही बंद पडू दिली नसल्याचे दिसून आल्याचा अनुभव श्रीपत यांनी सांगितला. त्यांनी हे सूर्योदय पुस्तक लिहिताना महिलांना सकारात्मक संदेश देऊन संकटांशी दोन हात करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी तिच्यासह तिच्या संसारात कसा सूर्योदय आणते हे मांडले आहे.

बातम्या वाचून मन हेलावल्यानेच सूर्योदय

शिक्षिका असल्याने समाजाशी आपली नाळ जुळलेली आहे. एक महिला कर्तापुरुष गेल्यावर हतबल होते. परंतु शेतकऱ्याची पत्नी मात्र कधीच हतबल झालेली मला आढळून आली नाही. त्यामुळे इतर महिलांनाही त्यांची प्रेरणा मिळावी यातूनच सूर्योदयची निर्मिती झाली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या वाचल्यावर आपण हेलावून जात असून, त्यातूनच ही संकल्पना सुचली. या पुस्तकाची प्रस्तावना साहित्यिक डॉ. देवकर्ण मदन आणि सहप्रस्तावना ही साहित्यिक रेखा बैजल यांनी लिहिली आहे.

प्रतिभा श्रीपत, शिक्षका, जैन मराठी विद्यालय, जालना