शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जालना जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:04 IST

चालू वर्षी जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणरायाच्या आगमनापासून पडणाऱ्या पावसामुळे गणेशोत्सवाची धूम चांगलीच रंगली आहे. चालू वर्षी जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. यात ९२३ मंडळांनी पोलिसांचा परवाना घेतला आहे. तर २१५ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडावा, एक गाव- एक गणपती, एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना अधिकाधिक मंडळांनी राबवावी, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेस्तरावरील अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या होत्या. पावसाअभावी गणेशोत्सवावरही दुष्काळाचे सावट होते. मात्र, गणरायाच्या आगमनापासून जिल्ह्यात सातत्याने कमी- अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील उत्साहही वाढला आहे. जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांतर्गत १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. यात (कंसातील आकडेवारी एक गाव- एक गणपतीचे) सदरबाजार ठाण्यांतर्गत ११८ गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली असून, १०१ मंडळे परवानाधारक आहेत. कदीम ठाण्यांतर्गत असलेल्या ४८ पैकी ३० मंडळांनी परवाना घेतला आहे. तालुका जालना ठाण्यांतर्गत असलेल्या १६५ पैकी २१ (१५ एक गावात एक गणपती) मंडळांनी परवाना घेतला आहे. चंदनझिरा ठाण्यांतर्गत असलेल्या ५५ पैकी ३५ (०५) मंडळांनी परवाना घेतला आहे. बदनापूर ठाण्यांतर्गत असलेल्या ८३ पैकी ७३ (२३) मंडळांनी परवाना घेतला आहे. अंबड ठाण्यांतर्गत असलेल्या १३२ पैकी ९० (१९) मंडळांनी परवाना घेतला आहे. गोंदी ठाण्यांतर्गत असलेल्या ८५ पैकी ५८ (३) मंडळांनी परवाना घेतला आहे. घनसावंगी ठाण्यांतर्गत असलेल्या ८२ पैकी ५० मंडळांनी परवाना घेतला आहे. परतूर ठाण्यांतर्गत असलेल्या ११४ पैकी ४५ (३१) मंडळांनी परवाना घेतला आहे. आष्टी ठाण्यांतर्गत असलेल्या ७७ पैकी ४५ (९) मंडळांनी परवाना घेतला आहे. मंठा ठाण्यांतर्गत असलेल्या ८६ पैकी ६६ (१५) मंडळांनी परवाना घेतला आहे. सेवली ठाण्यांतर्गत असलेल्या ४२ पैकी ३२ (१५) मंडळांनी परवाना घेतला आहे.जिल्ह्यात ६४६ मंडळे विना परवाना असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. यात सदरबाजार ठाण्यांतर्गत १७, कदीम- १८, तालुका जालना १४४, चंदनझिरा २०, बदनापूर- १०, अंबड- ४२, गोंदी- २७, घनसावंगी ३२, परतूर ६९, आष्टी ३२, मंठा २०, सेवली १०, मौजपुरी ६८, भोकरदन ५५, जाफराबाद १७, हसनाबाद ३१, टेंभुर्णी १४, पारध ठाण्यांतर्गत २० मंडळांनी विना परवाना श्रींची स्थापना केली आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganpati Festivalगणेशोत्सवReligious programmeधार्मिक कार्यक्रम