शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

जालना जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:04 IST

चालू वर्षी जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणरायाच्या आगमनापासून पडणाऱ्या पावसामुळे गणेशोत्सवाची धूम चांगलीच रंगली आहे. चालू वर्षी जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. यात ९२३ मंडळांनी पोलिसांचा परवाना घेतला आहे. तर २१५ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडावा, एक गाव- एक गणपती, एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना अधिकाधिक मंडळांनी राबवावी, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेस्तरावरील अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या होत्या. पावसाअभावी गणेशोत्सवावरही दुष्काळाचे सावट होते. मात्र, गणरायाच्या आगमनापासून जिल्ह्यात सातत्याने कमी- अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील उत्साहही वाढला आहे. जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांतर्गत १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. यात (कंसातील आकडेवारी एक गाव- एक गणपतीचे) सदरबाजार ठाण्यांतर्गत ११८ गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली असून, १०१ मंडळे परवानाधारक आहेत. कदीम ठाण्यांतर्गत असलेल्या ४८ पैकी ३० मंडळांनी परवाना घेतला आहे. तालुका जालना ठाण्यांतर्गत असलेल्या १६५ पैकी २१ (१५ एक गावात एक गणपती) मंडळांनी परवाना घेतला आहे. चंदनझिरा ठाण्यांतर्गत असलेल्या ५५ पैकी ३५ (०५) मंडळांनी परवाना घेतला आहे. बदनापूर ठाण्यांतर्गत असलेल्या ८३ पैकी ७३ (२३) मंडळांनी परवाना घेतला आहे. अंबड ठाण्यांतर्गत असलेल्या १३२ पैकी ९० (१९) मंडळांनी परवाना घेतला आहे. गोंदी ठाण्यांतर्गत असलेल्या ८५ पैकी ५८ (३) मंडळांनी परवाना घेतला आहे. घनसावंगी ठाण्यांतर्गत असलेल्या ८२ पैकी ५० मंडळांनी परवाना घेतला आहे. परतूर ठाण्यांतर्गत असलेल्या ११४ पैकी ४५ (३१) मंडळांनी परवाना घेतला आहे. आष्टी ठाण्यांतर्गत असलेल्या ७७ पैकी ४५ (९) मंडळांनी परवाना घेतला आहे. मंठा ठाण्यांतर्गत असलेल्या ८६ पैकी ६६ (१५) मंडळांनी परवाना घेतला आहे. सेवली ठाण्यांतर्गत असलेल्या ४२ पैकी ३२ (१५) मंडळांनी परवाना घेतला आहे.जिल्ह्यात ६४६ मंडळे विना परवाना असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. यात सदरबाजार ठाण्यांतर्गत १७, कदीम- १८, तालुका जालना १४४, चंदनझिरा २०, बदनापूर- १०, अंबड- ४२, गोंदी- २७, घनसावंगी ३२, परतूर ६९, आष्टी ३२, मंठा २०, सेवली १०, मौजपुरी ६८, भोकरदन ५५, जाफराबाद १७, हसनाबाद ३१, टेंभुर्णी १४, पारध ठाण्यांतर्गत २० मंडळांनी विना परवाना श्रींची स्थापना केली आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganpati Festivalगणेशोत्सवReligious programmeधार्मिक कार्यक्रम