शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'शत्रू वाढलेत, आता सावध राहण्याची गरज'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

By विजय मुंडे  | Updated: September 13, 2023 20:17 IST

''आता जर झोपलात तर पुढची सर्व पिढी वाया जाईल. आपला लढा अंतिम टप्प्यात आहे.''

वडीगोद्री (जालना) : कोर्टात जीआर रद्द होईल म्हणून सरकारला एक महिना वेळ दिला. एक महिना वाढता पाठिंबा द्या. तुम्ही थंड पडू नका. आपली कसोटी आहे. गावोगावी साखळी उपोषण करा, शांततेत आंदोलन करा. आपल्याला एवढे शत्रू वाढले की, मराठ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.

उपोषणाच्या १६व्या दिवशी जरांगे यांनी समाज बांधवांशी संवाद साधला. आता जर झोपलात तर पुढची सर्व पिढी वाया जाईल. आपला लढा अंतिम टप्प्यात आहे. महिना दिला आहे. आता मी महिनाभर इथेच आहे. गाफील राहू नका. संभ्रम निर्माण करू नका. सरकार युद्धनीती वापरत आहे. त्यांनी तीन डाव टाकले आहेत. माणसे अंगावर घालायची सिस्टीम अगोदर सुरू केली. सरकारची कसोटी लागली तशी आपलीही कसोटी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष, संघटनांनी मराठ्यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर कोणीही आले तरी त्यांना उद्धट बोलू नका, काळजी घ्या, असे आवाहन करीत जरांगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

महिलांची पदयात्रा  खडका येथील महिलांनी घराला कुलूप लावून अंतरवाली सराटी गावापर्यंत पदयात्रा काढली. मनोज जरांगे यांची कर्मभूमी असलेल्या गणेशनगर, मोहितेवस्ती, अंकुशनगर येथूनही सर्व मराठा बांधव व भगिनींची पदयात्रा लेझीम खेळत अंतरवाली सराटीत दाखल झाली. गढी ते गेवराई येथूनही मोठी पदयात्रा अंतरवाली सराटी गावात आली. उपोषणाच्या सोळाव्या दिवशीही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लोक येत होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना