शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

'शत्रू वाढलेत, आता सावध राहण्याची गरज'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

By विजय मुंडे  | Updated: September 13, 2023 20:17 IST

''आता जर झोपलात तर पुढची सर्व पिढी वाया जाईल. आपला लढा अंतिम टप्प्यात आहे.''

वडीगोद्री (जालना) : कोर्टात जीआर रद्द होईल म्हणून सरकारला एक महिना वेळ दिला. एक महिना वाढता पाठिंबा द्या. तुम्ही थंड पडू नका. आपली कसोटी आहे. गावोगावी साखळी उपोषण करा, शांततेत आंदोलन करा. आपल्याला एवढे शत्रू वाढले की, मराठ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.

उपोषणाच्या १६व्या दिवशी जरांगे यांनी समाज बांधवांशी संवाद साधला. आता जर झोपलात तर पुढची सर्व पिढी वाया जाईल. आपला लढा अंतिम टप्प्यात आहे. महिना दिला आहे. आता मी महिनाभर इथेच आहे. गाफील राहू नका. संभ्रम निर्माण करू नका. सरकार युद्धनीती वापरत आहे. त्यांनी तीन डाव टाकले आहेत. माणसे अंगावर घालायची सिस्टीम अगोदर सुरू केली. सरकारची कसोटी लागली तशी आपलीही कसोटी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष, संघटनांनी मराठ्यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर कोणीही आले तरी त्यांना उद्धट बोलू नका, काळजी घ्या, असे आवाहन करीत जरांगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

महिलांची पदयात्रा  खडका येथील महिलांनी घराला कुलूप लावून अंतरवाली सराटी गावापर्यंत पदयात्रा काढली. मनोज जरांगे यांची कर्मभूमी असलेल्या गणेशनगर, मोहितेवस्ती, अंकुशनगर येथूनही सर्व मराठा बांधव व भगिनींची पदयात्रा लेझीम खेळत अंतरवाली सराटीत दाखल झाली. गढी ते गेवराई येथूनही मोठी पदयात्रा अंतरवाली सराटी गावात आली. उपोषणाच्या सोळाव्या दिवशीही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लोक येत होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना