शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

परतुरातील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:50 IST

शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतली असून गुरुवारी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे नगरपालिकेच्या पथकाने काढली

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतली असून गुरुवारी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे नगरपालिकेच्या पथकाने काढली. कारवाई सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी स्वत:हून आपली दुकाने हटवली.परतूर शहरातील आष्टी रेल्वेगेट, तहसील कार्यालय दरम्यान रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे. सकाळी नऊ वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. न. प. चे पथक जेसीबी व ट्रॅक्टरसह पोलिस बंदोबस्तात रस्त्यावर उतरताच अतिक्रमणधारकांची धावपळ उडाली. काही जणांनी स्वत: अतिक्रमण काढून घेतले.नगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने पथकाच्या मदतीने अतिक्रमण काढले. अतिक्रमणात केवळ नाल्यावरील ओटे, बांधकाम, शेड, संरक्षक भिंती तोडण्यात आल्या. दिवसभराच्या कारवाईत रस्त्याच्या एका बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम तीन दिवस चालणार आहे. आष्टी रेल्वे गेटपासून ते महादेव मंदिर दरम्यान ७० फुटांचा, तसेच पुढे ५० फुटांचा रस्ता होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. उड्डाण पुलाच्या कामाबरोबरच रस्त्याचेही काम करण्यात येणार असल्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. या पथकात मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड, मनोहर तुंगनवार, अतूल देशपांडे, रवी देशपांडे, खनपटे, अनिल पारीख, अजगर अली, शिवदास चव्हाण, पोलीस निरीक्षक आर. टी. रेंगे, उपनिरीक्षक विजय जाधव, पो. कॉ. प्रल्हाद गुंजकर, भीमराव राठोड, एम. पी. सुरडकर, दुसाने, सोळंके, शाम गायके, चंपालाल घुसिंगे यांनी बंदोबस्त ठेवला.