शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

निवडणुकीनंतर उमेदवारांचा आरामासह आढाव्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:52 IST

गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला. मतदाना नंतरचा दुसरा दिवस अर्थात मंगळवारी जवळपास सर्व नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरामाला प्राधान्य दिले. एरवी सकाळी सातच्या आत बाहेर पडणाऱ्या नेत्यांच्या गाड्या तसेच त्यांच्या बंगल्यासमोर जमणारी गर्दी आज दिसून आली नाही. अनेक नेत्यांचा दिवस हा दुपारी एक वाजेनंतरच सुरू झाला. दिवसभर अत्यंत आरामदायी पध्दतीने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. यासाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासूनच नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू होती.मंगळवारी जालन्यातील शिवसेनचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आराम करण्याचा सल्ला देऊन स्वत: देखील १२ वाजेनंतर बाहेर पडणे पसंद केले. दुपारनंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्र तसेच नातेवाईकांकडे जाऊन एकूण परिस्थितीवर चर्चा केली. आलेल्या कार्यर्त्यांकडून कुठे कसे मतदान झाले याचा आढावा घेतला. काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी हाच कित्ता गिरवला.घनसावंगी मतदारसंघातील उमेदवार राजेश टोपे यांनीही सकाळी पाथरवाला येथील निवासस्थानी थांबून घरी आलेल्या पदाधिकारी, कार्यत्यााच्या भेटी घेतल्या. तसेच सायंकाळी मुंबईला आईला भेटण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. निवडणूकीच्या धामधूमित आई आजारी असतांनाही भेटीला जाता आले नसल्याची खंत आ. राजेश टोपे यांनी बोलून दाखवली.भोकरदन विधानसभेचे भाजपचे उमेदवार संतोष दानवे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी दुपारनंतर घरी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला. त्यांचाही दिवस उशिराच सुरू झाला. बदनापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. नारायण कुचे यांनी देखील बदनापूर तसेच अंबडसह अनेक गावात भेटी दिल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बबलू चौधरी यांनी जालन्यातून सकाळी उशिरा बदनापूरला जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. परतूर मतदार संघात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुपारनंतर कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आढावा घेतला. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेशकुमार जेथलिया हे दिवसभर परतूरमध्येच होते. त्यांनीही कार्यर्त्यांच्या भेटी घेतल्या.मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे, आता गुरूवारीच काय ते चित्र स्पष्ट होणार असले तरी अनेक तर्कवितर्क लावले जात असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत टोपे विरूध्द सर्व असे समीकरण या मतदारसंघात दिसून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हिकमत उढाण हे मंगळवारी घनसावंगीतच होते.नेहमीपेक्षा त्यांचा दिवस थोडा उशिराने सुरू झाला होता. त्यांनी आंतरवाली टेंभी, उकडगाव, रांजणी तसेच जालन्यातील जिल्हा सरकारी रूग्णालयास भेट दिली. या रूग्णालयात एका जखमी कार्यकर्त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण