शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

निवडणुकीनंतर उमेदवारांचा आरामासह आढाव्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:52 IST

गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला. मतदाना नंतरचा दुसरा दिवस अर्थात मंगळवारी जवळपास सर्व नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरामाला प्राधान्य दिले. एरवी सकाळी सातच्या आत बाहेर पडणाऱ्या नेत्यांच्या गाड्या तसेच त्यांच्या बंगल्यासमोर जमणारी गर्दी आज दिसून आली नाही. अनेक नेत्यांचा दिवस हा दुपारी एक वाजेनंतरच सुरू झाला. दिवसभर अत्यंत आरामदायी पध्दतीने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. यासाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासूनच नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू होती.मंगळवारी जालन्यातील शिवसेनचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आराम करण्याचा सल्ला देऊन स्वत: देखील १२ वाजेनंतर बाहेर पडणे पसंद केले. दुपारनंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्र तसेच नातेवाईकांकडे जाऊन एकूण परिस्थितीवर चर्चा केली. आलेल्या कार्यर्त्यांकडून कुठे कसे मतदान झाले याचा आढावा घेतला. काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी हाच कित्ता गिरवला.घनसावंगी मतदारसंघातील उमेदवार राजेश टोपे यांनीही सकाळी पाथरवाला येथील निवासस्थानी थांबून घरी आलेल्या पदाधिकारी, कार्यत्यााच्या भेटी घेतल्या. तसेच सायंकाळी मुंबईला आईला भेटण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. निवडणूकीच्या धामधूमित आई आजारी असतांनाही भेटीला जाता आले नसल्याची खंत आ. राजेश टोपे यांनी बोलून दाखवली.भोकरदन विधानसभेचे भाजपचे उमेदवार संतोष दानवे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी दुपारनंतर घरी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला. त्यांचाही दिवस उशिराच सुरू झाला. बदनापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. नारायण कुचे यांनी देखील बदनापूर तसेच अंबडसह अनेक गावात भेटी दिल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बबलू चौधरी यांनी जालन्यातून सकाळी उशिरा बदनापूरला जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. परतूर मतदार संघात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुपारनंतर कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आढावा घेतला. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेशकुमार जेथलिया हे दिवसभर परतूरमध्येच होते. त्यांनीही कार्यर्त्यांच्या भेटी घेतल्या.मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे, आता गुरूवारीच काय ते चित्र स्पष्ट होणार असले तरी अनेक तर्कवितर्क लावले जात असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत टोपे विरूध्द सर्व असे समीकरण या मतदारसंघात दिसून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हिकमत उढाण हे मंगळवारी घनसावंगीतच होते.नेहमीपेक्षा त्यांचा दिवस थोडा उशिराने सुरू झाला होता. त्यांनी आंतरवाली टेंभी, उकडगाव, रांजणी तसेच जालन्यातील जिल्हा सरकारी रूग्णालयास भेट दिली. या रूग्णालयात एका जखमी कार्यकर्त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण