शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:15 IST

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

जालना : जिल्ह्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दुपारी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षबागा, शेडनेटमधील बियाणे पिके, भाजीपाला, गहू, ज्वारी, हरभरा ही पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अगोदरच बोंडअळीमुळे कापसाचे पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला होता. त्यातच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाने बळीराजा कोलमडून गेला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार व शेडनेटमध्ये पिके घेणाºया शेतकºयांना एकरी पाच लाख रुपये फळे व भाजीपाला उत्पादकांना एकरी दोन लाख व हंगामी पिके घेणाºया शेतकºयांना एकरी पन्नास हजार रुपये या प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. वंजार उम्रद व निवडुंगा येथील शेतकºयांना शासनाने मदत करावी, असे निवेदनात नमूद आहे. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आ. संतोष सांबरे, पंडितराव भुतेकर, अ‍ॅड. भास्कर मगरे, भाऊसाहेब घुगे, संतोष मोहिते, बबनराव खरात, यादवराव राऊत, अ.माजिद कुरेशी, प्रभाकर घडलिंग, सुधाकर वाढेकर, सर्जेराव शेवाळे, ब्रह्मा वाघ, रमेश वाघ, बबन जाधव, कडुबा इंदलकर, विठ्ठलराव खरात, दत्ता खलसे, गणेश खरात, संतोष खरात आदींची उपस्थिती होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, बबलू चौधरी, शहराध्यक्ष राजेश राऊत, जयंत भोसले आदींची उपस्थिती होती.भरपाईस उशीर नको- टोपेजिल्ह्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी. नुकसान भरपाई देण्यास शासनाने विलंब लावू नये, अशी मागणी आ. राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीचे केवळ पंचनामे झाले असून, बाधित शेतकºयांना अद्याप मदत मिळालेली नाही. खरिपात झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकºयांना मिळालेली नाही, त्याचबरोबर तूर हमीभाव केंद्रावरील जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या अटी रद्द कराव्यात, जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाला लगामा लावावा या मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.