शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:15 IST

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

जालना : जिल्ह्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सोमवारी करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दुपारी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षबागा, शेडनेटमधील बियाणे पिके, भाजीपाला, गहू, ज्वारी, हरभरा ही पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अगोदरच बोंडअळीमुळे कापसाचे पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला होता. त्यातच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाने बळीराजा कोलमडून गेला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार व शेडनेटमध्ये पिके घेणाºया शेतकºयांना एकरी पाच लाख रुपये फळे व भाजीपाला उत्पादकांना एकरी दोन लाख व हंगामी पिके घेणाºया शेतकºयांना एकरी पन्नास हजार रुपये या प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. वंजार उम्रद व निवडुंगा येथील शेतकºयांना शासनाने मदत करावी, असे निवेदनात नमूद आहे. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आ. संतोष सांबरे, पंडितराव भुतेकर, अ‍ॅड. भास्कर मगरे, भाऊसाहेब घुगे, संतोष मोहिते, बबनराव खरात, यादवराव राऊत, अ.माजिद कुरेशी, प्रभाकर घडलिंग, सुधाकर वाढेकर, सर्जेराव शेवाळे, ब्रह्मा वाघ, रमेश वाघ, बबन जाधव, कडुबा इंदलकर, विठ्ठलराव खरात, दत्ता खलसे, गणेश खरात, संतोष खरात आदींची उपस्थिती होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, बबलू चौधरी, शहराध्यक्ष राजेश राऊत, जयंत भोसले आदींची उपस्थिती होती.भरपाईस उशीर नको- टोपेजिल्ह्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी. नुकसान भरपाई देण्यास शासनाने विलंब लावू नये, अशी मागणी आ. राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीचे केवळ पंचनामे झाले असून, बाधित शेतकºयांना अद्याप मदत मिळालेली नाही. खरिपात झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकºयांना मिळालेली नाही, त्याचबरोबर तूर हमीभाव केंद्रावरील जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या अटी रद्द कराव्यात, जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाला लगामा लावावा या मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.