शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राजुरात शेतकऱ्याचा विषप्राशनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:04 IST

अनेकवेळा मागणी करूनही नवीन रोहित्रावरून कृषीपंपासाठी समांतर वीज जोडणी करून देत नसल्याने त्रस्त झालेल्या पिंपळगांव थोटे येथील शेतक-याने राजूरच्या वीज उपकेंद्रात विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : अनेकवेळा मागणी करूनही नवीन रोहित्रावरून कृषीपंपासाठी समांतर वीज जोडणी करून देत नसल्याने त्रस्त झालेल्या पिंपळगांव थोटे येथील शेतक-याने राजूरच्या वीज उपकेंद्रात विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या अचानक उद्भवलेल्या प्रकारामुळे उपकेंद्रात मोठा गोंधळ उडाला होता.याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पिंपळगाव थोटे येथील गट क्रमांक १५९ मध्ये ईन्फ्रा योजनेअंतर्गत नवीन रोहित्र बसवण्यात आलेले आहे. सदर रोहित्रावरून समांतर वीज जोडणी देण्याची मागणी शेतकरी सचिन थोटे, नारायण थोटे, रवींद्र थोटे, विनायक साळवे, भीमराव गायकवाड यांनी अनेक वेळा राजूर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याकडे केली. मात्र, संबधित अधिकारी शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतक-यांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने अडचणी निर्माण होत आहे. शेतकºयांनी यापूर्वी अनेकवेळा महावितरणच्या अधिका-याकडे मागणी केली तसेच १७ मार्च २०१८ रोजी राजूर उपकेंद्रासमोर उपोषण केले होते. त्यावेळी संबंधित अधिका-यांनी नवीन रोहित्रावरून वीज जोडणी करून देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. परंतू दोन महिने झाले तरी वीज जोडणी करून मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या सचिन थोटे या शेतकºयाने बुधवारी दुपारी साडेचार वाजता राजूर उपकेंद्रात येऊन वीज जोडणीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करून खिशातून विषारी द्रवाची बाटली काढून तोंंडाला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच्या शेतकरी व कर्मचा-यांनी वेळीच त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांना रोखले तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी