शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

खाद्यतेलाने महागाईमध्ये तेल ओतले, वर्षभरात लिटरमागे ८७ रूपयांपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

जालना : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वर्षभरात लिटरमागे ४१ ते ...

जालना : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वर्षभरात लिटरमागे ४१ ते ४७ रूपयापर्यंत भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. खाद्यतेलाची दरवाढ दुुप्पटीकडे जात असतानाही विक्रीत परिणाम झाला नाही.

मागील वर्षी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यातील खाद्यतेलाचे दर मार्चमध्ये लिटरमागे १५ ते २० रूपयांनी उतरले. मात्र, त्यानंतर तेलाचे भाव कधी २ तर कधी ५ रूपये लिटरने वाढत गेले. संथगतीने दरवाढ सुरूच होती. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात लिटरमागे १० ते २५ रूपयांची वाढ झाली.

दिवाळीनंतर खाद्यतेलाचे भाव उतरतील, अशी अपेक्षा व्यापारी व ग्राहकांना होती. परंतु, ती फोल ठरली. अनपेक्षितपणे तेल दराचा भडका सुरू राहिला. खाद्यतेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महिन्याच्या बजेटवर त्याचा परिणाम झाला आहे. तेलाच्या वाढत्या दरामुळे व्यापारी देखील हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

सूर्यफूल तेलात ८५ रूपयांनी वाढ

गतवर्षीच्या तुलनेत सूर्यफूल तेलात लिटरमागे ८५ रूपयांची वाढ झाली. तर करडीचे तेल ६० रूपयांनी वधारले. पाम तेलामध्ये ४५, तर सरकी तेलात ५० रूपयांची वाढ झाली. एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने नागरिक हैराण आहे. तर दुसरीकडे तेलाच्या दरात वाढत होत असल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.

वर्षभरापासून तेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सूर्यफूल तेल आयातीवर अवलंबून आहे. भारतात आयात शुल्क वाढल्याने तेजी आली आहे. परिणामी स्थानिक तेलही महाग झाले. तेलाचे भाव ४१ ते ८७ रूपयापर्यंत वाढले आहे. भाव वाढले असले तरी त्याचा विक्रीवर परिणाम झाला नाही.

किसन राठोड, किराणा व्यापारी

मागील काही दिवसापासून खाद्यतेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाव वाढले असले तरी दैनंदिन जीवनात तेल आवश्यक बनले आहे. त्यामुळे तेल खरेदी करावेच लागते. शासनाने तेलाचे भाव कमी करावे.

निकिता शेवाळे, जालना

कितीही दरवाढ झाली तरी साखर, मीठ, तेल अत्यावश्यक आहे. पालेभाज्यांसाठी कमी प्रमाणात तेल वापरता येईल. मात्र, इतर भाज्यांना तेल थोडे जास्तच लागते. प्रती माणूस महिन्याला अर्धा किलो तेल आवश्यक असले तरी अगदी काटेकोर प्रमाण धरून संसार कसा चालेल ?

मुक्ता माने, जालना

मागील काही दिवसापासून तेलाच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाकात तेल अत्यावश्यक असल्याने तेल खरेदी करावेच लागते. किराणा खरेदी करताना इतर वस्तू कमी करून तेल खरेदी करावे लागत आहे. शासनाने तेलाचे भाव कमी करावे.

मंदा गायकवाड, जालना