शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाने महागाईमध्ये तेल ओतले, वर्षभरात लिटरमागे ८७ रूपयांपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

जालना : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वर्षभरात लिटरमागे ४१ ते ...

जालना : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वर्षभरात लिटरमागे ४१ ते ४७ रूपयापर्यंत भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. खाद्यतेलाची दरवाढ दुुप्पटीकडे जात असतानाही विक्रीत परिणाम झाला नाही.

मागील वर्षी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यातील खाद्यतेलाचे दर मार्चमध्ये लिटरमागे १५ ते २० रूपयांनी उतरले. मात्र, त्यानंतर तेलाचे भाव कधी २ तर कधी ५ रूपये लिटरने वाढत गेले. संथगतीने दरवाढ सुरूच होती. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात लिटरमागे १० ते २५ रूपयांची वाढ झाली.

दिवाळीनंतर खाद्यतेलाचे भाव उतरतील, अशी अपेक्षा व्यापारी व ग्राहकांना होती. परंतु, ती फोल ठरली. अनपेक्षितपणे तेल दराचा भडका सुरू राहिला. खाद्यतेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महिन्याच्या बजेटवर त्याचा परिणाम झाला आहे. तेलाच्या वाढत्या दरामुळे व्यापारी देखील हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

सूर्यफूल तेलात ८५ रूपयांनी वाढ

गतवर्षीच्या तुलनेत सूर्यफूल तेलात लिटरमागे ८५ रूपयांची वाढ झाली. तर करडीचे तेल ६० रूपयांनी वधारले. पाम तेलामध्ये ४५, तर सरकी तेलात ५० रूपयांची वाढ झाली. एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने नागरिक हैराण आहे. तर दुसरीकडे तेलाच्या दरात वाढत होत असल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.

वर्षभरापासून तेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सूर्यफूल तेल आयातीवर अवलंबून आहे. भारतात आयात शुल्क वाढल्याने तेजी आली आहे. परिणामी स्थानिक तेलही महाग झाले. तेलाचे भाव ४१ ते ८७ रूपयापर्यंत वाढले आहे. भाव वाढले असले तरी त्याचा विक्रीवर परिणाम झाला नाही.

किसन राठोड, किराणा व्यापारी

मागील काही दिवसापासून खाद्यतेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाव वाढले असले तरी दैनंदिन जीवनात तेल आवश्यक बनले आहे. त्यामुळे तेल खरेदी करावेच लागते. शासनाने तेलाचे भाव कमी करावे.

निकिता शेवाळे, जालना

कितीही दरवाढ झाली तरी साखर, मीठ, तेल अत्यावश्यक आहे. पालेभाज्यांसाठी कमी प्रमाणात तेल वापरता येईल. मात्र, इतर भाज्यांना तेल थोडे जास्तच लागते. प्रती माणूस महिन्याला अर्धा किलो तेल आवश्यक असले तरी अगदी काटेकोर प्रमाण धरून संसार कसा चालेल ?

मुक्ता माने, जालना

मागील काही दिवसापासून तेलाच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाकात तेल अत्यावश्यक असल्याने तेल खरेदी करावेच लागते. किराणा खरेदी करताना इतर वस्तू कमी करून तेल खरेदी करावे लागत आहे. शासनाने तेलाचे भाव कमी करावे.

मंदा गायकवाड, जालना