शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

खाद्यतेलाने महागाईमध्ये तेल ओतले, वर्षभरात लिटरमागे ८७ रूपयांपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

जालना : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वर्षभरात लिटरमागे ४१ ते ...

जालना : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वर्षभरात लिटरमागे ४१ ते ४७ रूपयापर्यंत भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. खाद्यतेलाची दरवाढ दुुप्पटीकडे जात असतानाही विक्रीत परिणाम झाला नाही.

मागील वर्षी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यातील खाद्यतेलाचे दर मार्चमध्ये लिटरमागे १५ ते २० रूपयांनी उतरले. मात्र, त्यानंतर तेलाचे भाव कधी २ तर कधी ५ रूपये लिटरने वाढत गेले. संथगतीने दरवाढ सुरूच होती. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात लिटरमागे १० ते २५ रूपयांची वाढ झाली.

दिवाळीनंतर खाद्यतेलाचे भाव उतरतील, अशी अपेक्षा व्यापारी व ग्राहकांना होती. परंतु, ती फोल ठरली. अनपेक्षितपणे तेल दराचा भडका सुरू राहिला. खाद्यतेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महिन्याच्या बजेटवर त्याचा परिणाम झाला आहे. तेलाच्या वाढत्या दरामुळे व्यापारी देखील हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

सूर्यफूल तेलात ८५ रूपयांनी वाढ

गतवर्षीच्या तुलनेत सूर्यफूल तेलात लिटरमागे ८५ रूपयांची वाढ झाली. तर करडीचे तेल ६० रूपयांनी वधारले. पाम तेलामध्ये ४५, तर सरकी तेलात ५० रूपयांची वाढ झाली. एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने नागरिक हैराण आहे. तर दुसरीकडे तेलाच्या दरात वाढत होत असल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.

वर्षभरापासून तेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सूर्यफूल तेल आयातीवर अवलंबून आहे. भारतात आयात शुल्क वाढल्याने तेजी आली आहे. परिणामी स्थानिक तेलही महाग झाले. तेलाचे भाव ४१ ते ८७ रूपयापर्यंत वाढले आहे. भाव वाढले असले तरी त्याचा विक्रीवर परिणाम झाला नाही.

किसन राठोड, किराणा व्यापारी

मागील काही दिवसापासून खाद्यतेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाव वाढले असले तरी दैनंदिन जीवनात तेल आवश्यक बनले आहे. त्यामुळे तेल खरेदी करावेच लागते. शासनाने तेलाचे भाव कमी करावे.

निकिता शेवाळे, जालना

कितीही दरवाढ झाली तरी साखर, मीठ, तेल अत्यावश्यक आहे. पालेभाज्यांसाठी कमी प्रमाणात तेल वापरता येईल. मात्र, इतर भाज्यांना तेल थोडे जास्तच लागते. प्रती माणूस महिन्याला अर्धा किलो तेल आवश्यक असले तरी अगदी काटेकोर प्रमाण धरून संसार कसा चालेल ?

मुक्ता माने, जालना

मागील काही दिवसापासून तेलाच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाकात तेल अत्यावश्यक असल्याने तेल खरेदी करावेच लागते. किराणा खरेदी करताना इतर वस्तू कमी करून तेल खरेदी करावे लागत आहे. शासनाने तेलाचे भाव कमी करावे.

मंदा गायकवाड, जालना