शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

दुष्काळात खचून न जाता शेळीपालनातून साधली आर्थिक प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:25 IST

यशकथा : हा व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसून कर्जही काढले नसल्याचे त्यांनी सांगितले.

- फकिरा देशमुख  ( जालना ) 

दुष्काळी परिस्थितीमध्ये खचून न जाता, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या तीन- चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत असे असतानाही गोकुळ, ता. भोकरदन येथील शेतकरी उत्तम बंडू पालोदे यांनी शेतीपूरक असलेल्या शेळीपालनाच्या व्यवसायातून चांगली आर्थिक उन्नती साधली आहे.

केळना या छोट्याशा नदीच्या काठावर गोकुळ हे गाव वसलेले आहे. मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाला भोकरदन तालुकाही  अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे हैराण झाले आहेत. शेतीचा व्यवसाय तोट्यात जात असल्याने आता काय करावे असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर आहे. सततच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी येथील शेतकरी उत्तम पालोदे यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निश्चय केला. त्यांच्याकडे दहा एकर शेतजमीन आहे. परंतु कोणता शेतीपूरक व्यवसाय परवडेल याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. यातच त्यांच्या शेजारच्या गावातील शेतकरी विनोद गावंडे यांनी शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर असल्याचे सांगून मीसुद्धा तो करण्याचा निश्चय केल्याचे सांगितले. यानंतर उत्तम पालोदे यांनीही शेळीपालन करण्याचे ठरविले.

मात्र, तांत्रिकदृष्ट्या शेळीपालन कसे करावे याबाबत त्यांना माहिती नव्हते, त्यामुळे मनात अनेक शंका-कुशंका होत्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित धुमाळ, डॉ. गायकवाड यांनी हा व्यवसाय कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. उत्तम पालोदे यांनी नंतर पडेगाव (औरंगाबाद) येथून सुरुवातीला ६० ते ७० हजार रुपये खर्च करून १० उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. त्यासाठी ८०० स्क्वेअर फुटांचे टीनच्या पत्र्यांचे शेड तयार करून तीन वर्षांपूर्वी  हा व्यवसाय सुरू केला. उत्तम नियोजन व व्यवस्थापनाने पालोदे यांचा हा व्यवसाय फायद्यात पडला असून, दरवर्षी त्यांना खर्च वजा जाता दोन लाखांपर्यंत निव्वळ नफा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे बोकड किवा शेळी विक्रीसाठी  कोणत्याही बाजारात जावे लागत नाही. व्यापारी घरपोच बोकड खरेदी करण्यासाठी गावात येतात, असे उत्तम पालोदे यांनी  सांगितले. हा व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसून कर्जही काढले नसल्याचे त्यांनी सांगितले. खर्चाची तरतूद नसेल तर, कमी शेळ्यांवर व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला उत्तम पालोदे देतात. शेळ्यांना खाद्य म्हणून ते शेतात हिरवा घास नियमित टाकतात. तसेच मक्याच्या कडवळीचाही उपयोग खाद्य म्हणून करतात. जनावरांच्या आजाराबाबत ते सजग असून, चाहूल लागताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो किंवा उपचार केले जातात. आज पालोदे यांच्याकडे ४० लहान मोठ्या शेळ्या असून अनेक बोकड विक्री केले आहेत. व्यापाऱ्यांना विक्री करताना आपण बोकडाचे वजन करूनच विक्री करीत असल्यामुळे इतरांपेक्षा आपणास जास्त पैसे मिळतात, असे पालोदे यांनी सांगितले़

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी