शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळात खचून न जाता शेळीपालनातून साधली आर्थिक प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:25 IST

यशकथा : हा व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसून कर्जही काढले नसल्याचे त्यांनी सांगितले.

- फकिरा देशमुख  ( जालना ) 

दुष्काळी परिस्थितीमध्ये खचून न जाता, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या तीन- चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत असे असतानाही गोकुळ, ता. भोकरदन येथील शेतकरी उत्तम बंडू पालोदे यांनी शेतीपूरक असलेल्या शेळीपालनाच्या व्यवसायातून चांगली आर्थिक उन्नती साधली आहे.

केळना या छोट्याशा नदीच्या काठावर गोकुळ हे गाव वसलेले आहे. मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाला भोकरदन तालुकाही  अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे हैराण झाले आहेत. शेतीचा व्यवसाय तोट्यात जात असल्याने आता काय करावे असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर आहे. सततच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी येथील शेतकरी उत्तम पालोदे यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निश्चय केला. त्यांच्याकडे दहा एकर शेतजमीन आहे. परंतु कोणता शेतीपूरक व्यवसाय परवडेल याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. यातच त्यांच्या शेजारच्या गावातील शेतकरी विनोद गावंडे यांनी शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर असल्याचे सांगून मीसुद्धा तो करण्याचा निश्चय केल्याचे सांगितले. यानंतर उत्तम पालोदे यांनीही शेळीपालन करण्याचे ठरविले.

मात्र, तांत्रिकदृष्ट्या शेळीपालन कसे करावे याबाबत त्यांना माहिती नव्हते, त्यामुळे मनात अनेक शंका-कुशंका होत्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित धुमाळ, डॉ. गायकवाड यांनी हा व्यवसाय कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. उत्तम पालोदे यांनी नंतर पडेगाव (औरंगाबाद) येथून सुरुवातीला ६० ते ७० हजार रुपये खर्च करून १० उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. त्यासाठी ८०० स्क्वेअर फुटांचे टीनच्या पत्र्यांचे शेड तयार करून तीन वर्षांपूर्वी  हा व्यवसाय सुरू केला. उत्तम नियोजन व व्यवस्थापनाने पालोदे यांचा हा व्यवसाय फायद्यात पडला असून, दरवर्षी त्यांना खर्च वजा जाता दोन लाखांपर्यंत निव्वळ नफा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे बोकड किवा शेळी विक्रीसाठी  कोणत्याही बाजारात जावे लागत नाही. व्यापारी घरपोच बोकड खरेदी करण्यासाठी गावात येतात, असे उत्तम पालोदे यांनी  सांगितले. हा व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसून कर्जही काढले नसल्याचे त्यांनी सांगितले. खर्चाची तरतूद नसेल तर, कमी शेळ्यांवर व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला उत्तम पालोदे देतात. शेळ्यांना खाद्य म्हणून ते शेतात हिरवा घास नियमित टाकतात. तसेच मक्याच्या कडवळीचाही उपयोग खाद्य म्हणून करतात. जनावरांच्या आजाराबाबत ते सजग असून, चाहूल लागताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो किंवा उपचार केले जातात. आज पालोदे यांच्याकडे ४० लहान मोठ्या शेळ्या असून अनेक बोकड विक्री केले आहेत. व्यापाऱ्यांना विक्री करताना आपण बोकडाचे वजन करूनच विक्री करीत असल्यामुळे इतरांपेक्षा आपणास जास्त पैसे मिळतात, असे पालोदे यांनी सांगितले़

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी