शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

मार्चनंतर ई-वे बिल लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:27 IST

आगामी मार्च महिन्यानंतर राज्यासह देशभरात ई-वे बील लागू होणार असून, ते कुठल्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असेल, अशी माहिती चार्टर्ड अकाऊंटंट उमेश शर्मा यांनी दिली.

जालना : आगामी मार्च महिन्यानंतर राज्यासह देशभरात ई-वे बील लागू होणार असून, ते कुठल्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असेल, अशी माहिती चार्टर्ड अकाऊंटंट उमेश शर्मा यांनी दिली. यंदाचा अर्थसंकल्प हा समतोल असल्याचे ते म्हणाले. सहकारी भारतीच्या वतीने आयोजित ई-वे बिल मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.कलश सिड्सच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी आयोजित या शिबिरास ज्येष्ठ कर सल्लागार श्रीनिवास भक्कड, सहकारी भारतीचे जिल्हाध्यक्ष शिवरतन मुंदडा, कलश सिड्सचे संचालक समीर अग्रवाल, उपाध्यक्ष हेमंत ठक्कर आणि सहकार भारतीचे सचिव अ‍ॅड. दशरथ इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शर्मा म्हणाले की, प्रामुख्याने ई-वे बील तयार करताना ते ए' आणि बी' अशा टप्यात बनवावे लागणार आहे. बील बनल्यानंतर ते दोन तासात रद्द करून दुसरे बिल बनवणे शक्य आहे. बैलगाडीतून वस्तू अथवा माल पाठविणे आणि ५० हजारांपेक्षा कमी किंमतीच्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी ई-वे बिलाची गरज राहणार नाही. प्रामुख्याने ई-वे बिल आणि संबंधित वाहनांची रस्त्यावर दोन ठिकाणी तपासणी होऊ शकते. एकतर सीमेवर अथवा एखाद्या वेळेस आयुक्तांच्या मनात आल्यास, अशा वेळी तपासणी झाल्यास आणि त्यात त्रुटी आढळल्यास किमान २५ हजार रुपयांच्या पुढे दंडाची तरतूद आहे. जीएसटी, ई-वे बीलासह पूवीर्पासूनच अनेक बाबींची तरतूद शासनाने केलेली आहे. शेती आणि आरोग्यावर भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतीसाठी ठोस धोरण राबविण्याचा प्रयत्न आगामी काळात होणार असून, ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आलेल्या आहे. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी निरसन केले. सहकार भारतीचे शिवरतन मुंदडा यांनी प्रास्ताविकात विविध मुद्यांवर भूमिका मांडली.हेमंत ठक्कर यांनी सूत्रसंचालन केले. हरीश बागवे यांनी आभार मानले. यावेळी सहकारी भारतीचे मराठवाडा संघटक विजय देशमुख, आडतीय असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, उद्योजक फुलचंद भक्कड, अरुण लाहोटी, गोवर्धन करवा, पीयूष मुंदडा, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, सुनील जोशी, व्यापारी रमेशचंद्र तवरावाला, विनित साहनी, महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दादराव तुपकर, किशोर देशपांडे, उद्योजक अरुण अग्रवाल, सीए चंद्रकांत चोबे यांच्यासह उद्योजक, व्यापारी आणि कर सल्लागारांची उपस्थिती होती.------------चांगला परिणाम दिसून येईल-श्रीनिवास भक्कडअध्यक्षीय समारोप करताना श्रीनिवास भक्कड म्हणाले की, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातील अनेक बाबी सध्या तरी अस्पष्ट आहेत. मात्र, एकंदरीत अर्थसंकल्पाचा अभ्यास केल्यास त्याचा भविष्यात निश्चितच चांगला परिणाम दिसून येणार आहे. कृषीला देण्यात आलेली प्राथमिकता विशेष उल्लेखनीय असून, त्यात शेतीमालाचे भाव कमी-जास्त होऊ नये म्हणून राबविण्यात येणा-या योजनेचेही त्यांनी स्वागत केले.