शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

मार्चनंतर ई-वे बिल लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:27 IST

आगामी मार्च महिन्यानंतर राज्यासह देशभरात ई-वे बील लागू होणार असून, ते कुठल्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असेल, अशी माहिती चार्टर्ड अकाऊंटंट उमेश शर्मा यांनी दिली.

जालना : आगामी मार्च महिन्यानंतर राज्यासह देशभरात ई-वे बील लागू होणार असून, ते कुठल्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असेल, अशी माहिती चार्टर्ड अकाऊंटंट उमेश शर्मा यांनी दिली. यंदाचा अर्थसंकल्प हा समतोल असल्याचे ते म्हणाले. सहकारी भारतीच्या वतीने आयोजित ई-वे बिल मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.कलश सिड्सच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी आयोजित या शिबिरास ज्येष्ठ कर सल्लागार श्रीनिवास भक्कड, सहकारी भारतीचे जिल्हाध्यक्ष शिवरतन मुंदडा, कलश सिड्सचे संचालक समीर अग्रवाल, उपाध्यक्ष हेमंत ठक्कर आणि सहकार भारतीचे सचिव अ‍ॅड. दशरथ इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शर्मा म्हणाले की, प्रामुख्याने ई-वे बील तयार करताना ते ए' आणि बी' अशा टप्यात बनवावे लागणार आहे. बील बनल्यानंतर ते दोन तासात रद्द करून दुसरे बिल बनवणे शक्य आहे. बैलगाडीतून वस्तू अथवा माल पाठविणे आणि ५० हजारांपेक्षा कमी किंमतीच्या वस्तूची वाहतूक करण्यासाठी ई-वे बिलाची गरज राहणार नाही. प्रामुख्याने ई-वे बिल आणि संबंधित वाहनांची रस्त्यावर दोन ठिकाणी तपासणी होऊ शकते. एकतर सीमेवर अथवा एखाद्या वेळेस आयुक्तांच्या मनात आल्यास, अशा वेळी तपासणी झाल्यास आणि त्यात त्रुटी आढळल्यास किमान २५ हजार रुपयांच्या पुढे दंडाची तरतूद आहे. जीएसटी, ई-वे बीलासह पूवीर्पासूनच अनेक बाबींची तरतूद शासनाने केलेली आहे. शेती आणि आरोग्यावर भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतीसाठी ठोस धोरण राबविण्याचा प्रयत्न आगामी काळात होणार असून, ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आलेल्या आहे. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी निरसन केले. सहकार भारतीचे शिवरतन मुंदडा यांनी प्रास्ताविकात विविध मुद्यांवर भूमिका मांडली.हेमंत ठक्कर यांनी सूत्रसंचालन केले. हरीश बागवे यांनी आभार मानले. यावेळी सहकारी भारतीचे मराठवाडा संघटक विजय देशमुख, आडतीय असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, उद्योजक फुलचंद भक्कड, अरुण लाहोटी, गोवर्धन करवा, पीयूष मुंदडा, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, सुनील जोशी, व्यापारी रमेशचंद्र तवरावाला, विनित साहनी, महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दादराव तुपकर, किशोर देशपांडे, उद्योजक अरुण अग्रवाल, सीए चंद्रकांत चोबे यांच्यासह उद्योजक, व्यापारी आणि कर सल्लागारांची उपस्थिती होती.------------चांगला परिणाम दिसून येईल-श्रीनिवास भक्कडअध्यक्षीय समारोप करताना श्रीनिवास भक्कड म्हणाले की, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातील अनेक बाबी सध्या तरी अस्पष्ट आहेत. मात्र, एकंदरीत अर्थसंकल्पाचा अभ्यास केल्यास त्याचा भविष्यात निश्चितच चांगला परिणाम दिसून येणार आहे. कृषीला देण्यात आलेली प्राथमिकता विशेष उल्लेखनीय असून, त्यात शेतीमालाचे भाव कमी-जास्त होऊ नये म्हणून राबविण्यात येणा-या योजनेचेही त्यांनी स्वागत केले.