शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना काळात २८४ मुली सैराट, घरी परतल्या ७९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:58 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यात गतवर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. असे असतानाही २८४ मुली सैराट झाल्या आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जालना : जिल्ह्यात गतवर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. असे असतानाही २८४ मुली सैराट झाल्या आहेत. यात विशेष म्हणजे, महिलांचाही समावेश आहे. यातील केवळ ७९ मुली घरी परतल्या असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

देशासह राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. दुसरीकडे मात्र याच काळात सर्वाधिक मुली पळून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील तीन वर्षांचा विचार केला असता, जिल्ह्यातून कोरोना काळात मुली पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गतवर्षात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २८४ गुन्हे दाखल आहेत. १८ वर्षांखालील मुलगी पळून गेली असेल, हरवलेली असेल तर, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. १८ वर्षांच्या पुढील मुली अथवा महिलेच्या गुन्ह्यात मिसिंग दाखल करण्यात येते. बहुतांश प्रकरणांत मुली किंवा महिला या त्यांच्या मर्जीने प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने किंवा सोबत राहण्यासाठी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अनेक प्रकरणांत सहमतीने पळून गेल्यामुळे या प्रकरणात १८ वर्षे पूर्ण नसले तर त्या मुला-मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात येते. दरम्यान, अनेक जण अल्पवयीन असताना फरार झाले असतील तर, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यातदेखील हजर झालेले आहेत. पोलीस प्रशासनाकडून सातत्याने त्यांचा शोध घेतला जातो. त्यामुळे वर्षाअखेर जेवढे गुन्हे दाखल झालेले असतात. त्यापैकी बहुतांश गुन्हे निकाली निघतात. पोलीस विभागाकडून मुलींचा शोध घेतल्या जात आहे.

९० मुलेही बेपत्ता

जिल्ह्यातून तब्बल १११ मुले पळून गेले होते. त्यापैकी २१ मुले मिळून आले आहेत, तर अद्यापही ९० मुलांचा पोलिसांना शोध लागला नाही. पोलीस या मुलांचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२०५ मुलींचा शोध लागेना

जालना जिल्ह्यात मागील वर्षात तब्बल २८४ मुली पळून गेल्या आहेत. त्यातील ७९ मुली मिळून आल्या आहेत. अद्यापही २०५ मुलींचा शोध लागला नाही.

मागील काही दिवसांपासून महाविद्यालयातील मुले-मुली पळून जात आहेत. हा चिंतेचा विषय आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पालकांनीदेखील तेवढेच सतर्क राहून पाल्यावर लक्ष दिले पाहिजे. आम्ही पळून गेलेल्या मुलींचा शोध घेत आहोत.

- सुभाष भुजंग, पोनि. स्थानिक गुन्हे शाखा.