शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जालना जिल्ह्यात सिंचन, पाणीपुरवठ्याची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 10:48 IST

उन्हाळा तोंडावर आला असताना जिल्ह्यातील अनेक गावांमधील पेयजल योजनेची कामे ठप्प आहेत. सिंचन आणि बांधकाम विभागाच्या अनेक कामांना ब्रे्रक लागला आहे. या तिन्ही विभागांत अधिकारी व कर्मचा-यांची एकूण ५७ पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांचे ग्रहण-भाग-३बाबासाहेब म्हस्के/जालना : उन्हाळा तोंडावर आला असताना जिल्ह्यातील अनेक गावांमधील पेयजल योजनेची कामे ठप्प आहेत. सिंचन आणि बांधकाम विभागाच्या अनेक कामांना ब्रे्रक लागला आहे. या तिन्ही विभागांत अधिकारी व कर्मचा-यांची एकूण ५७ पदे रिक्त आहेत.जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या महिन्यात जिल्ह्यातील अनेक गावे व वाड्या वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २२ कोटी ४८ लाखांचा टंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे. टंचाई आराखडा तयार केला असला तरी अनेक गावांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसह, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची कामे अनेक वर्षांपासून पूर्ण झालेली नाहीत. मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. सिंचन विभागामार्फत केल्या जाणा-या जलसंधारणाच्या कामांनाही रिक्त पदांमुळे ब्रेक लागला आहे. या विभागाच्या माध्यमातून केली जाणारी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर सिमेंट नाला बांध व अन्य कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. अपूर्ण कर्मचा-यांमुळे या विभागाकडून जलसंधारणाच्या कामांची माहिती वेळेत पाठवल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता, आरेखक इ. पदे रिक्त असल्याने सिंचन, बांधकाम व पाणीपुरवठा विभागाच्या कामांवर परिणाम झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. विशिष्ट जबाबदारी असणा-या अनेक तांत्रिक अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने, ही कामे तात्पुरती इतर अधिकायांकडून करून घेतली जात आहेत. त्यामुळे कामांच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.---------------सिंचन, बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांशी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांच्या ६६ पदांपैकी आठ, स्थापत्य अभियंता सहायकांची ६१ पैकी २७, आरेखक, तारतंत्री, संगणक, जोडारी ही पदे रिक्त असून, तिन्ही विभागांत पदोन्नतीने भरावयाची १३ पदे रिक्त आहेत. याच विभागांचा उपविभाग असलेल्या यांत्रिक विभागातही वायू संपि.चालकाची तीन, जॅक ड्रीलरचे एक व कनिष्ठ अभियंताचे एक पद रिक्त आहे.-------------