शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाविकांनाही बसणार पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजूर : येथे श्री जन्मोत्सवानिमित्त होणाºया हरिनाम सप्ताहासह कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असताना पाणीटंचाईने घर करायला ...

ठळक मुद्देराजूर : श्रीजन्म सोहळा; ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष; टँकर सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : येथे श्री जन्मोत्सवानिमित्त होणाºया हरिनाम सप्ताहासह कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असताना पाणीटंचाईने घर करायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांत जन्मोत्सव कार्यक्रम सुरू होणार असून अगोदरच नागरिक पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे श्रींच्या चरणी माथा टेकवण्यासाठी जिल्हाभरातून येणाºया हजारो भाविकांना पाणी समस्येचा फटका बसणार आहे. ग्रामपंचायतीकडूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.राजूर गावासह राजुरेश्वर मंदिरासाठी चांदई एक्को प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. परंतु या प्रकल्पाची पाणीपातळी सध्या घटली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. १४ जानेवारी पासून राजुरेश्वर मंदिराच्या पायथ्याशी श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होत आहे.या सोहळ्यास दररोज हजारो भाविक हजेरी लावतात. मुक्कामी राहणाºया भाविकांची संख्या मोठी असते. मुक्कामी राहणाºया भाविकांना पाण्याची गरज लागणार आहे. सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामविकास अधिकारी एस. बी. शिंंदे यांनी गेल्या महिन्यात पंचायत समितीकडे पाच शासकीय पाणीपुरवठ्याचे टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. सोहळा एक दिवसांवर येऊन ठेपलेला असून टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी शासकीय पाणीपुरवठ्याचे टँकर लवकर सुरू करावे, अशी मागणी उपसरपंच विनोद डवले, ग्रामपंचायत सदस्य राहुल दरक यांनी केली आहे.