शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच देश तंत्रज्ञानात अग्रेसर-गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:02 IST

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आज तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत आज तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भांदरगे हे होते. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कल्याण दळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राख, जिल्हा सरचिटणीस आलमखान पठाण, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंद लोखंडे, माजी नगरसेवक वैभव उगले, गोविंद बोराडे, संजय भगत, शिवराज जाधव, नदीम बांबूवाले आदींची उपस्थिती होती.गोरंट्याल म्हणाले की, राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. माहिती व तंत्रज्ञान हा त्याचाच एक भाग असून माहिती तंत्रज्ञानाला दिलेल्या महत्वामुळेच आज भारताने विविध क्षेत्रात चौफेर प्रगती केली असून, जगाच्या पाठीवर भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र राख यांनी केले. याप्रसंगी गणेश वाघमारे, जॉर्ज उगले, नदीम पहेलवान, आकाश लाखे, मनोज गुडेकर, गोपाल चित्राल, सी. के. डोईफोडे, म्हस्के, अफजल सौदागर, एहतेशाम मोमीन, अनिस चाऊस यांच्यासह काँग्रेस समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेस