शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

आंबा निर्यात केंद्रालाही दुष्काळाचा फटका

By admin | Updated: May 23, 2015 00:38 IST

गजेंद्र देशमुख , जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या आंबा निर्यात सुविधा केंद्रास यंदा पडलेला दुष्काळ व अवकाळी पाऊस यामुळे मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

गजेंद्र देशमुख , जालनायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या आंबा निर्यात सुविधा केंद्रास यंदा पडलेला दुष्काळ व अवकाळी पाऊस यामुळे मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. आंब्याच्या अत्यल्प उत्पादनामुळे निर्यातीत घट येण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादकांना परदेशात आंबे पाठविता यावेत, म्हणून पाच ते सहा वर्षांपूर्वी येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आंबा निर्यात सुविधा केंद्र सुरु करण्यात आले. येथील केशर आंबा युरोपीय देशात निर्यात केला जातो. दरवर्षी २० टनांच्या आसपास आंबा निर्यात केला जातो. यंदा हे प्रमाण अर्ध्यापेक्षाही कमी होणार आहे. या केंद्रातंर्गत जालना, बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आंबा निर्यात करु शकतात. परदेशात आंबा पाठविण्यासाठी येथे २५ मेट्रिक टन क्षमतेचे दोन सुसज्ज केंद्र आहेत. परदेशात निर्यात करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व निकष येथे पाळले जातात. शीतगृह, पॅकिंग हाऊस ,प्रत वारी करण्यासाठी मशीन्स केंद्रात आहेत. गतवर्षी मे व जून अखेर २५ टन आंबा अमेरिकेसह इतर युरोपिय देशांत निर्यात झाला होता.मराठवाड्यात उत्पादित होणाऱ्या चविष्ट अशा केशर आंब्यास मोठी मागणी आहे. या आंब्याची चव विदेशातील जनतेला चाखता यावी म्हणून आंबा निर्यात सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. निर्यातदार व शेतकरी यांच्या दराबाबत करार होऊन आंबा मागणी आलेल्या देशात पाठविला जातो. आंबा निर्यातीतून शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक फायदा होत आहे.याविषयी निर्यात सुविधा केंद्रातील अधिकारी कांबळे म्हणाले की, दुष्काळ व अवकाळी पाऊस यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले.परिणामी अद्यापपर्यंत केंद्रात निर्यातक्षम आंबा दाखल झालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यात कमी होईल. जून महिन्यात आंबा निर्यात होण्याचा अंदाज कांबळे यांनी व्यक्त केला. गतवर्षी केशर आंब्याचे उत्पादन चांगले झाले होते. या केंद्रात निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. उच्च दर्जाची तपासणी करुन येथून आंबे निर्यात केले जातात.