शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:51 IST

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. नेते निवडणुकीत गुंतल्याने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्याने जनता हैराण झाली आहे.जालना शहरात गेल्या आठवडाभरात कधी वादळी वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस यामुळे ‘बत्ती गुल’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वा-यामुळे तर संपूर्ण शहर हे पाच तास अंधारात होते. पावसाळापूर्व देखभाल दुरूस्ती ही दरवर्षी केली जाते, त्यावर संबंधित कंत्राटदाराला लाखो रूपयांची देयके अदा करण्यात येतात. असे असताना देखील विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच संभाजीनगरमध्ये असेच तारांवर झाड कोसळल्याने मोठा विलंब झाला होता. एकूणच वीज पुरवठ्याकडे ना वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ना प्रशासकीय अधिका-यांचे लक्ष आहे.कोणाचाच वचक राहिला नाहीवीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जे कॉल सेंटर आहेत, तेथील दूरध्वनी हे बाजूला काढून ठेवण्याचे अनेक प्रकार सर्रासपणे घडतात. वीजपुरवठा खंडित होऊन तो पुन्हा कधी पूर्ववत होईल, याची माहिती विचारण्यासाठी वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याने देखील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी ज्या प्रमाणे लक्ष दिले जाते, त्या धर्तीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकडेही तेवढेच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण