शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

जालना जि.प.सभेत निधी वाटपावरुन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:26 IST

जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत मागील जि. प. च्या सभांमध्ये अधिका-यांना दुष्काळाचे नियोजन करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले होेते. परंतु, अद्यापही अधिका-यांनी पाहिजे तसे दुष्काळाचे नियोजन न केल्याने सदस्यांनी अधिका-यांना शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत धारेवर धरले.

ठळक मुद्देसदस्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर : जि.प. प्रशासनाचे दुष्काळातही ढिसाळ नियोजनाने सदस्य संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत मागील जि. प. च्या सभांमध्ये अधिका-यांना दुष्काळाचे नियोजन करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले होेते. परंतु, अद्यापही अधिका-यांनी पाहिजे तसे दुष्काळाचे नियोजन न केल्याने सदस्यांनी अधिका-यांना शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत धारेवर धरले. तसेच निधी वाटपाच्या मुद्यावरुन सभेत गोंधळ उडाला.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, अतिरिक्त मुख्य अधिकारी देशमुख, अतिरिक्त मुख्य अधिकारी सुरेश बेदमुथा, वित्त अधिकारी चव्हाण यांच्यासह सर्व सभापती व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सुरुवातीलाच सदस्य राहुल लोणीकर यांनी दुष्काळाचा मुद्दा उपस्थित केला. सध्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहे. परंतु, ती कामे अत्यंत कासव गतीने सुरु असून, या कामांना अधिकारी वेग देत नाही. तसेच इतरही कामे होत नाही. त्यामुळे येणाºया काळात नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होऊ शकतात. दुष्काळातही अधिकारी कामचुकारपणा करीत असेल तर अशा अधिकाºयांवर कडक कारवाई करावी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना अध्यक्ष म्हणाले की, जे अधिकारी दुष्काळात कामचुकारपणा करीत आहे. त्यांच्यावर कडक करावी करण्यात येईल. जर अधिकाºयांना दुष्काळात काम करण्याची इच्छा नसेल तर त्यांनी रजेवर जावे किंवा आपली बदली करुन घ्यावी, असेही अध्यक्ष म्हणाले.सदस्य जयमंगल जाधव यांनी दलित वस्तीचा अखर्चीत निधी व बीडीओंच्या मनमानी कारभारवरुन बीडीओंना धारेवर धरले. ते म्हणाले की, जालना पंचायत समिती सोडून एकाही पंचायत समितीने दलित वस्तीचा निधी खर्च केला नाही. तसेच जालना पंचायत समितीचे बीडीओ हे सदस्यांना योग्य माहिती देत नाही. जालना पंचायत समितीने अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरु केली नाही. याबाबत त्यांच्याविरुध्द अनेंक तक्रारी आल्या आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जयमंगल जाधव यांनी केली.त्यानंतर निधी वाटपावरुन भाजपच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सर्व सदस्यांना योग्य निधी देण्यात यावा. कमी प्रमाणात निधी आला की, आम्हाला कामे करता येत नाही.यावरुनच सदस्य शालिकराम म्हस्के व उपाध्यक्ष टोपे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या सभेस सर्व सभापती, सदस्य, सर्व विभागाचे अधिकारी व पचायंत समितीचे बीडीओंची उपस्थिती होती.५० टक्के अधिकारी अनुपस्थितशुक्रवारी झालेल्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह ५० टक्के अधिकाºयांची अनुपस्थिती होती. अनुपस्थित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. सदस्य शालीकराम म्हस्के म्हणाले की, मागील सभेतही अधिकाºयांची उपस्थिती नव्हती. या सभेतर ५० टक्के अधिकाºयांनी दांडी मारली. या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना अध्यक्ष खोतकर म्हणाले की, अनुपस्थित अधिकाºयांना नोटीसा पाठविण्यात येतील.

टॅग्स :Jalanaजालनाzpजिल्हा परिषद