शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जालना जि.प.सभेत निधी वाटपावरुन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:26 IST

जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत मागील जि. प. च्या सभांमध्ये अधिका-यांना दुष्काळाचे नियोजन करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले होेते. परंतु, अद्यापही अधिका-यांनी पाहिजे तसे दुष्काळाचे नियोजन न केल्याने सदस्यांनी अधिका-यांना शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत धारेवर धरले.

ठळक मुद्देसदस्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर : जि.प. प्रशासनाचे दुष्काळातही ढिसाळ नियोजनाने सदस्य संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत मागील जि. प. च्या सभांमध्ये अधिका-यांना दुष्काळाचे नियोजन करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले होेते. परंतु, अद्यापही अधिका-यांनी पाहिजे तसे दुष्काळाचे नियोजन न केल्याने सदस्यांनी अधिका-यांना शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत धारेवर धरले. तसेच निधी वाटपाच्या मुद्यावरुन सभेत गोंधळ उडाला.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, अतिरिक्त मुख्य अधिकारी देशमुख, अतिरिक्त मुख्य अधिकारी सुरेश बेदमुथा, वित्त अधिकारी चव्हाण यांच्यासह सर्व सभापती व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सुरुवातीलाच सदस्य राहुल लोणीकर यांनी दुष्काळाचा मुद्दा उपस्थित केला. सध्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहे. परंतु, ती कामे अत्यंत कासव गतीने सुरु असून, या कामांना अधिकारी वेग देत नाही. तसेच इतरही कामे होत नाही. त्यामुळे येणाºया काळात नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होऊ शकतात. दुष्काळातही अधिकारी कामचुकारपणा करीत असेल तर अशा अधिकाºयांवर कडक कारवाई करावी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना अध्यक्ष म्हणाले की, जे अधिकारी दुष्काळात कामचुकारपणा करीत आहे. त्यांच्यावर कडक करावी करण्यात येईल. जर अधिकाºयांना दुष्काळात काम करण्याची इच्छा नसेल तर त्यांनी रजेवर जावे किंवा आपली बदली करुन घ्यावी, असेही अध्यक्ष म्हणाले.सदस्य जयमंगल जाधव यांनी दलित वस्तीचा अखर्चीत निधी व बीडीओंच्या मनमानी कारभारवरुन बीडीओंना धारेवर धरले. ते म्हणाले की, जालना पंचायत समिती सोडून एकाही पंचायत समितीने दलित वस्तीचा निधी खर्च केला नाही. तसेच जालना पंचायत समितीचे बीडीओ हे सदस्यांना योग्य माहिती देत नाही. जालना पंचायत समितीने अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरु केली नाही. याबाबत त्यांच्याविरुध्द अनेंक तक्रारी आल्या आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जयमंगल जाधव यांनी केली.त्यानंतर निधी वाटपावरुन भाजपच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सर्व सदस्यांना योग्य निधी देण्यात यावा. कमी प्रमाणात निधी आला की, आम्हाला कामे करता येत नाही.यावरुनच सदस्य शालिकराम म्हस्के व उपाध्यक्ष टोपे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या सभेस सर्व सभापती, सदस्य, सर्व विभागाचे अधिकारी व पचायंत समितीचे बीडीओंची उपस्थिती होती.५० टक्के अधिकारी अनुपस्थितशुक्रवारी झालेल्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह ५० टक्के अधिकाºयांची अनुपस्थिती होती. अनुपस्थित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. सदस्य शालीकराम म्हस्के म्हणाले की, मागील सभेतही अधिकाºयांची उपस्थिती नव्हती. या सभेतर ५० टक्के अधिकाºयांनी दांडी मारली. या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना अध्यक्ष खोतकर म्हणाले की, अनुपस्थित अधिकाºयांना नोटीसा पाठविण्यात येतील.

टॅग्स :Jalanaजालनाzpजिल्हा परिषद