शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

बालविवाह लावण्यात जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST

जालना : महिला व बालविकास विभागाच्या वतीने गत वर्षात सर्वाधिक ५२ बालविवाह रोखले आहेत. बालसंरक्षक समित्या, पोलिसांच्या मदतीने या ...

जालना : महिला व बालविकास विभागाच्या वतीने गत वर्षात सर्वाधिक ५२ बालविवाह रोखले आहेत. बालसंरक्षक समित्या, पोलिसांच्या मदतीने या कारवाया केल्या आहेत. या कारवाया पाहता, बालविवाह लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे.

अल्पवयीन मुलींचे विवाह होऊ नयेत, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या शारीरिक, मानसिकतेवर होणारे परिणाम, कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची असलेली तरतूद आदींबाबत जनजागृती केली आहे. मात्र, जनजागृती करूनही जिल्ह्यातील बालविवाहचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. चाइल्ड लाइन, पोलीस विभाग किंवा महिला व बालविकास विभागाकडे तक्रारी आल्यानंतरच हे बालविवाह रोखले जातात, अन्यथा शहरी, ग्रामीण भागात अनेक अल्पवयीन मुलींचे विवाह प्रशासनाला माहिती होऊ न देताच लावले जात आहेत.

कोरोनाच्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात बालविवाह वाढले

कोरोनाच्या कालावधीत विवाह समारंभालाही मोजकेच नागरिक उपस्थित राहणे आणि कोरोनातील सूचनांचे पालन करणे हा नियम सक्तीचा करण्यात आला होता. याच कालावधीत जिल्ह्यात सर्वधिक बालविवाह लावण्याचे प्रयत्न झाले आहेत. ज्या विवाहांची माहिती मिळाली, तेथे प्रशासनाकडून विवाह रोखण्याची कारवाई झाली.

जिल्ह्यात ५७० बालसंरक्षक समित्या पाहतात काम

जिल्ह्यात ७७९ ग्रामपंचायती आहेत. पैकी ५७० ग्रामपंचायतीत बालसंरक्षक समित्या कार्यरत आहेत. उर्वरित ग्रामपंचायतीत या समित्या अद्याप कार्यरत नाहीत. गावस्तरावर ग्रामसेवक व अंगणवाडी ताई गावातील पदाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून काम पाहत आहेत.

बालविवाह कायदा काय आहे?

मुलगा २१ व मुलगी १८ वर्षांहून कमी वयाची असल्यास हा विवाह गुन्हा ठरतो. त्यामुळे असा विवाह करणारे व त्यासाठी प्रोत्साहित करणारे, विवाहास उपस्थित राहणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होतो. यात दोन वर्षांचा सश्रम कारावास व आर्थिक दंडाचीही तरतूद आहे.

अल्पवयीन मुलींचे विवाह होवू नयेत, यासाठी प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जाते. बालविवाह होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच, संबंधित ठिकाणी जावून वधू-वराकडील मंडळींचे समुपदेशन केले जाते. त्या उपरही बालविवाह झाला, तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जात आहे.

- इंदू परदेशी, महिला व बालविकास अधिकारी