शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात एक हजार कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:27 IST

जालना जिल्ह्यात खरीप आणि रबी हंगामात मिळून जवळपास एक हजार ३९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात खरीप आणि रबी हंगामात मिळून जवळपास एक हजार ३९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले असून, जालना जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे एकूण एक हजार ४०० कोटी रूपयांचा इष्टांक निश्चित करण्यात आला होता.जिल्ह्यात यंदा दुष्काळ असल्याने मोठ्या प्रमाणावर पीककर्ज काढण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. पीककर्ज वाटपासाठी यावेळी जिल्हाधिकारी तसेच सहकार निबंधकांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे तालुका निहाय कर्ज वाटप मेळावे घेतले होते. त्यात तहसीलदार, तालुका उपनिबंधक सर्व बँक अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या मेळाव्यात येऊन आवश्यक ते कागदपत्र सादर करून पीककर्ज मिळावे म्हणून प्रयत्न करण्यात आले होते.या प्रशासनाच्या उपक्रमामुळे जास्तीत जास्त शेतक-यांना पीककर्ज मिळाले आहे. जिल्ह्यात एकूण २१ राष्ट्रीयकृत, ३ सहकारी, ग्रामीण बँक तसेच मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून हे पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कर्ज वाटपाची ही टक्केवारी जवळपास ७२ टक्के होते. त्यात खरीप हंगामात ८९१ कोटी १६ लाख रुपये हे जवळपास एक लाख ३९ हजार शेतक-यांना देण्यात आले. तर रबी हंगामात १८ हजार ८१७ शेतक-यांना १४७ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले.हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप होण्याची ही जिल्ह्याची पहिलीच वेळ असून, ही कर्ज वाटपाची योजना जवळपास एक हजार १०० कोटी रुपयांवर जाईल असे बँकेतील अधिका-यांनी सांगितले. पीककर्जाच्या माध्यमातून अनेक शेतक-यांनी पेरणीसाठी बियाणे खरेदीसह खत खरेदीसाठी घेतले आहे. तर काहींनी शेतात ठिबक सिंचनाचा संच बसविण्यासाठी कर्ज घेतले आहे.शेतक-यांना दिलासा : कर्जमाफीमुळे फायदापीककर्ज मोठ्या प्रमाणावर वाटप झाल्याने आणि नंतर लगेचच राज्य सरकारने जुलै महिन्यात कर्जमाफी जाहीर केल्याने त्याचा मोठा लाभ शेतक-यांना झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून जवळपास दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी झाल्याने त्याचा मोठा लाभ जिल्ह्यातील शेतक-यांना झाला असून, जवळपास ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी जिल्ह्यातील शेतक-यांना मिळाली असल्याचे सांगण्यात आले. सर्व बँकांनी अधिकाधिक कर्ज वाटप करावे म्हणून जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना केल्यानेच हे शक्य झाले असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निशांत इलमकर आणि सहायक व्यवस्थापक तायडे यांनी सांगितले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्र