शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जालना जिल्ह्यात एक हजार कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:27 IST

जालना जिल्ह्यात खरीप आणि रबी हंगामात मिळून जवळपास एक हजार ३९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात खरीप आणि रबी हंगामात मिळून जवळपास एक हजार ३९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले असून, जालना जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे एकूण एक हजार ४०० कोटी रूपयांचा इष्टांक निश्चित करण्यात आला होता.जिल्ह्यात यंदा दुष्काळ असल्याने मोठ्या प्रमाणावर पीककर्ज काढण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. पीककर्ज वाटपासाठी यावेळी जिल्हाधिकारी तसेच सहकार निबंधकांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे तालुका निहाय कर्ज वाटप मेळावे घेतले होते. त्यात तहसीलदार, तालुका उपनिबंधक सर्व बँक अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या मेळाव्यात येऊन आवश्यक ते कागदपत्र सादर करून पीककर्ज मिळावे म्हणून प्रयत्न करण्यात आले होते.या प्रशासनाच्या उपक्रमामुळे जास्तीत जास्त शेतक-यांना पीककर्ज मिळाले आहे. जिल्ह्यात एकूण २१ राष्ट्रीयकृत, ३ सहकारी, ग्रामीण बँक तसेच मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून हे पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कर्ज वाटपाची ही टक्केवारी जवळपास ७२ टक्के होते. त्यात खरीप हंगामात ८९१ कोटी १६ लाख रुपये हे जवळपास एक लाख ३९ हजार शेतक-यांना देण्यात आले. तर रबी हंगामात १८ हजार ८१७ शेतक-यांना १४७ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले.हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप होण्याची ही जिल्ह्याची पहिलीच वेळ असून, ही कर्ज वाटपाची योजना जवळपास एक हजार १०० कोटी रुपयांवर जाईल असे बँकेतील अधिका-यांनी सांगितले. पीककर्जाच्या माध्यमातून अनेक शेतक-यांनी पेरणीसाठी बियाणे खरेदीसह खत खरेदीसाठी घेतले आहे. तर काहींनी शेतात ठिबक सिंचनाचा संच बसविण्यासाठी कर्ज घेतले आहे.शेतक-यांना दिलासा : कर्जमाफीमुळे फायदापीककर्ज मोठ्या प्रमाणावर वाटप झाल्याने आणि नंतर लगेचच राज्य सरकारने जुलै महिन्यात कर्जमाफी जाहीर केल्याने त्याचा मोठा लाभ शेतक-यांना झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून जवळपास दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी झाल्याने त्याचा मोठा लाभ जिल्ह्यातील शेतक-यांना झाला असून, जवळपास ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी जिल्ह्यातील शेतक-यांना मिळाली असल्याचे सांगण्यात आले. सर्व बँकांनी अधिकाधिक कर्ज वाटप करावे म्हणून जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना केल्यानेच हे शक्य झाले असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निशांत इलमकर आणि सहायक व्यवस्थापक तायडे यांनी सांगितले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्र