शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात मुद्रा बँकेचे कर्जवाटप सुसाट, साडेतीनशे कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:29 IST

जिल्ह्यात मुद्रा बँके मार्फत करण्यात येणाऱ्या कर्जवाटपाची गती लक्षणीय असून, कार्यकर्ते सांभाळण्यासाठीच्या योजनेतून दोन वर्षात ३५१ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मुद्रा बँके मार्फत करण्यात येणाऱ्या कर्जवाटपाची गती लक्षणीय असून, कार्यकर्ते सांभाळण्यासाठीच्या योजनेतून दोन वर्षात ३५१ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले असून, याचा लाभ ५८ हजार लाभार्थ्यांना झाला असल्याचे सांगण्यात आले.या योजने अंतर्गत छोटे आणि मध्य परंपरागत व्यावसायिकांना कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यात शिशू गट दहा हजार ते ५० हजार, किशोर गट ५० हजार ते ५ लक्ष, तरूण गट ५ लक्ष १० लक्ष रूपयांचे कर्जपुरवठा करण्यात येतो. या याजनेतून कर्ज देताना बँकांना कुठलेही तारण आणि जामीनदाराशिवाय कर्ज मिळत आहे. यामुळे परंपरागत व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाते. यात सुतार, गवंडी, शिंपी, धोबी, फळ विक्रेते तसेच छोटा व्यवसाय करणा-यांनाही यातून कर्ज दिले जात आहे. हे कर्ज देण्यामागे छोट्या व्यावसायिकांना कुठल्याच बँका या तारण आणि जामीनदारा शिवाय कर्ज देत नसत. त्यामुळे हे व्यवसाय अडचणीत सापडले होते. पंतप्रधान मुद्रा बँक योजनेतून हे कर्ज मिळाल्याने अनेकांना मोठा आधार मिळाला आहे. या योजनेतून २०१७-१८ मध्ये २३६ कोटी रूपये मंजूर झाले झाले होते. त्यापैकी २२७ कोटी ७१ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले होते. तर चालू वर्षात १३१ कोटी रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पैकी १२३ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.२५ वर्षापूर्वी देखील पंतप्रधानांच्या नावाने पीएमईजीवायएस ही योजना जाहीर केली होती. त्या योजनेतूनही अशाच प्रकारे लहान आणि मध्यम बेरोजगार युवकांना विविध व्यवसायासाठी कर्ज वाटप केले होते. मात्र अद्यापही त्या योजनेतील कर्ज वसूली न झाल्याने बँका आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून पाठपुरावा सुरू आहे. पुन्हा या सरकारनेही अशीच योजना आणली असून, ही योजना केवळ ज्यांचे व्यवसाय सुरू आहेत. त्यांच्यासाठी असल्याने पूर्वीच्या योजने प्रमाणे कर्ज थकनार नसले तरी, हे कर्ज देताना कुठलीही स्थावर मालमत्ता तारण न ठेवता तसेच एकही जामीनदार नसल्याने भविष्यात या योजनेच्या कर्ज परतफेडीची चिंता आतापासूनच बँकांना सतावत आहे. असे असले तरी याची जाहीर वाच्च्यता बँक अधिकारी करत नसून, खासगीत मात्र ही योजना म्हणजे एक पांढरा हत्ती ठरू शकते असेही सांगण्यात येते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाbusinessव्यवसायBanking Sectorबँकिंग क्षेत्र