शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

अतिवृष्टी अनुदानाचे ९४ कोटी रूपये वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

विजय मुंडे जालना : अतिवृष्टीने बाधित पिकांच्या नुकसान अनुदानाचे जिल्हा बँकांच्या शाखांमधून वाटप सुरू आहे. आजवर जिल्हा बँकेने ५६६ ...

विजय मुंडे

जालना : अतिवृष्टीने बाधित पिकांच्या नुकसान अनुदानाचे जिल्हा बँकांच्या शाखांमधून वाटप सुरू आहे. आजवर जिल्हा बँकेने ५६६ गावातील २ लाख १५ हजार १७३ शेतकऱ्यांना ९४ कोटी २० लाख रूपये अनुदानाचे वाटप केले आहे.

अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या पिकांची माती झाली नव्हे नदीकाठी असलेल्या शेतजमिनीतील मातीच पाण्यासोबत वाहून गेली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्यानंतर शासनस्तरावरून मदतीची घोषणा करण्यात आली. शासनकडून प्राप्त अनुदानापैकी १३६ कोटी ९१ लाख ३५ हजार रूपयांचे अनुदान जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आले होते. बँकेने ८६३ गावातील ३ लाख ३८ हजार ५२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग केले आहे. वर्ग केलेल्या अनुदानापैकी आजवर ५६६ गावातील २ लाख १५ हजार १७३ शेतकऱ्यांना ९४ कोटी २० लाख रूपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यात जालना तालुक्यातील १६ हजार ८५३ शेतकऱ्यांना ९ कोटी ६७ लाख ९७ हजार रूपये, बदनापूर तालुक्यातील १० हजार ४६१ शेतकऱ्यांना ५ कोटी ८ लाख २६ हजार रूपये, अंबड तालुक्यातील ४५ हजार २१० शेतकऱ्यांना २० कोटी ७२ लाख रूपये, घनसावंगी तालुक्यातील ५३ हजार ८२५ शेतकऱ्यांना २८ कोटी २७ लाख ४७ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर भोकरदन तालुक्यातील ३४ हजार ३३३ शेतकऱ्यांना ६ कोटी ५६ लाख ५१ हजार रूपये, जाफराबाद तालुक्यातील ९९८६ शेतकऱ्यांना २ कोटी ७९ लाख ७१ हजार रूपये, परतूर तालुक्यातील २१ हजार ५६५ शेतकऱ्यांना १० कोटी ७ लाख ६१ हजार रूपये तर मंठा तालुक्यातील २२ हजार ९४० शेतकऱ्यांना ११ कोटी सात हजार रूपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

५६६ गावातील लाभार्थ्यांना लाभ

शासनस्तरावरून जिल्ह्यातील ८६३ गावातील ३ लाख ३८ हजार ५२५ शेतकऱ्यांसाठी १३६ कोटी ९१ लाख ३५ हजार रूपये मंजूर झाले आहेत. पैकी ५६६ गावातील ९४ कोटी २० लाख २४ हजार रूपये वाटप करण्यात आले आहेत.

अपुरे कर्मचारी अन् तांत्रिक समस्या

जिल्हा बँकेतील अपुरे कर्मचारी आणि शाखास्तरावर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनुदान वाटपाची गती रोडावली आहे. याचा त्रास ग्रामीण भागातील शेतकरी, ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडविण्याची गरज आहे.

किसान सन्मानचे २० कोटी जमा

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे २० कोटी ७४ लाख रूपयेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. याचा जिल्ह्यातील एक लाख ३ हजार ७११ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

लवकरच पूर्ण वाटप

शासनाकडून आलेले सर्वच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. त्यातील ६८ टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान पुढील आठवड्यापर्यंत वाटप होईल. शाखा स्तरावरील समस्याही लवकरच सोडविण्यात येतील.

आशुतोष देशमुख

कार्यकारी संचालक, जिल्हा बँक