शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गावातील तंटे पुन्हा पोलिसांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 01:10 IST

गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेतून समृध्दीकडे जावे, या चांगल्या हेतूने शासनाने तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. मात्र समितीचे पदाधिकारी आपले अधिकार आणि कर्तव्याबाबत अनभिज्ञ असल्याचे गावातील तंटे सोडविण्यासाठी गावकरी पुन्हा पोलीस ठाण्याचे दार ठोठावत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेतून समृध्दीकडे जावे, या चांगल्या हेतूने शासनाने तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. मात्र समितीचे पदाधिकारी आपले अधिकार आणि कर्तव्याबाबत अनभिज्ञ असल्याचे गावातील तंटे सोडविण्यासाठी गावकरी पुन्हा पोलीस ठाण्याचे दार ठोठावत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तंटामुक्त ग्रामसमित्या नावालाच उरली की काय, अशी शंका येते. शासनाच्या या चांगल्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे.पोलिसांवरील कामाचा वाढता ताण कमी व्हावा, गावातील भांडण, तंटे सामजस्याने गावातच मिटवावे या चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरु करुन गावात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांचे अधिकार कोणते, तंटे कसे मिटवावेत, ग्रामस्थांनी पोलिसाकडे न जाता समितीकडे कसे येतील याबाबत समितीचे पदाधिकारी तसेच गावकरी अनभिज्ञ आहेत. समितींच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराची जाणीव परिपूर्ण नसल्याने बहुतांश गावातील तंट्याच्या तक्रारी ठाण्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून पोलीस विभागावरील ताणही वाढत आहे. गावातील वाद गावातच सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या नावालाच उरल्या आहेत.ग्रामीण भागात गावपातळीवर सभेचे आयोजन करुन जनजागृती करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. गावातील वाद पोलीस ठाण्यात आले की अनेकांचे हात ओले होतात.त्यामुळे पोलीस सुध्दा नागरिकांना तंटामुक्तीविषयी जागृत करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. शासनाच्या चांगल्या योजना असल्या तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रचार - प्रचार होताना जिल्ह्यात दिसत नाही.शासनाने गावातील तंटे गावातच मिटविल्यास त्या गावाला लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते. समितीचे पदाधिकारी पुरस्कार मिळविण्यासाठी मोठी धडपड करतात, मात्र गावातील तंटे मिटविताना दिसत नाही. गावातल्या गावात अबोला नको म्हणून समितीतील पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. गावातील तंटे कमी झाल्यावर त्या गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार देण्यात येतो, मात्र त्या गावातील तंटे कायमस्वरुपी मिटविण्यासाठी समित्या निष्क्रिय ठरत आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSocialसामाजिकgram panchayatग्राम पंचायत