शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

गावातील तंटे पुन्हा पोलिसांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 01:10 IST

गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेतून समृध्दीकडे जावे, या चांगल्या हेतूने शासनाने तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. मात्र समितीचे पदाधिकारी आपले अधिकार आणि कर्तव्याबाबत अनभिज्ञ असल्याचे गावातील तंटे सोडविण्यासाठी गावकरी पुन्हा पोलीस ठाण्याचे दार ठोठावत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेतून समृध्दीकडे जावे, या चांगल्या हेतूने शासनाने तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. मात्र समितीचे पदाधिकारी आपले अधिकार आणि कर्तव्याबाबत अनभिज्ञ असल्याचे गावातील तंटे सोडविण्यासाठी गावकरी पुन्हा पोलीस ठाण्याचे दार ठोठावत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तंटामुक्त ग्रामसमित्या नावालाच उरली की काय, अशी शंका येते. शासनाच्या या चांगल्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे.पोलिसांवरील कामाचा वाढता ताण कमी व्हावा, गावातील भांडण, तंटे सामजस्याने गावातच मिटवावे या चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरु करुन गावात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांचे अधिकार कोणते, तंटे कसे मिटवावेत, ग्रामस्थांनी पोलिसाकडे न जाता समितीकडे कसे येतील याबाबत समितीचे पदाधिकारी तसेच गावकरी अनभिज्ञ आहेत. समितींच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराची जाणीव परिपूर्ण नसल्याने बहुतांश गावातील तंट्याच्या तक्रारी ठाण्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून पोलीस विभागावरील ताणही वाढत आहे. गावातील वाद गावातच सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या नावालाच उरल्या आहेत.ग्रामीण भागात गावपातळीवर सभेचे आयोजन करुन जनजागृती करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. गावातील वाद पोलीस ठाण्यात आले की अनेकांचे हात ओले होतात.त्यामुळे पोलीस सुध्दा नागरिकांना तंटामुक्तीविषयी जागृत करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. शासनाच्या चांगल्या योजना असल्या तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रचार - प्रचार होताना जिल्ह्यात दिसत नाही.शासनाने गावातील तंटे गावातच मिटविल्यास त्या गावाला लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते. समितीचे पदाधिकारी पुरस्कार मिळविण्यासाठी मोठी धडपड करतात, मात्र गावातील तंटे मिटविताना दिसत नाही. गावातल्या गावात अबोला नको म्हणून समितीतील पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. गावातील तंटे कमी झाल्यावर त्या गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार देण्यात येतो, मात्र त्या गावातील तंटे कायमस्वरुपी मिटविण्यासाठी समित्या निष्क्रिय ठरत आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSocialसामाजिकgram panchayatग्राम पंचायत