शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दीड कोटी रुपयांच्या मंजुरीवरून सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:59 IST

सभा संपल्यानंतरच अध्यक्षांनी सदर रकमेत वाढ करून १ कोटी ५० लाखांच्या कामांना मंजुरी दिली. अध्यक्षांनी कोणत्या अधिकाराखाली या कामांना मंजुरी दिली, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील सभेत सिंचन विभागातून बांधकाम विभागात १ कोटी रुपये वर्ग करण्याचा ठराव घेण्यात आला होता. या ठरावाला सभागृहाने मंजुरी देखील दिली होती. परंतु, सभा संपल्यानंतरच अध्यक्षांनी सदर रकमेत वाढ करून १ कोटी ५० लाखांच्या कामांना मंजुरी दिली. अध्यक्षांनी कोणत्या अधिकाराखाली या कामांना मंजुरी दिली, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. त्यानंतर या कामाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली.मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती कळंबे, सभापती तौर, सभापती बनसोडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांची उपस्थिती होती.सभेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर हैदराबाद व उन्नाव येथील घटनेत मयत झालेल्यांना युवतींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सदस्य अवधूत खडके म्हणाले की, मागील सभेत अध्यक्षांनी सिंचन विभागातून बांधकाम विभागात १ कोटी रुपये वर्ग केले होते. याबाबत सभेत ठरावही घेण्यात आला. परंतु, अध्यक्षांनी या रक्कमेत ५० लाखांची वाढ करून कामांना मंजुरी दिली. या रकमेत वाढ करण्याची गरज काय ? तसेच सभा संपल्यानंतर अध्यक्षांनी रात्री आठ वाजता सदरील रकमेच्या कामांना मंजुरी दिली. रातोरात मंजुरी देण्याचे कारण काय, असा सवाल करून या कामात अनियमित्तता झाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अवधूत खडके यांनी केली. या प्रकरणावरूनच सभेत गोंधळ उडाला. भाजपचे सदस्य व अध्यक्षांमध्ये वादावादी झाली. यावर उत्तर देताना अध्यक्ष म्हणाले, सदर प्रकरणात कुठल्याही प्रकारची अनियमित्तता झाली नाही. तुम्ही म्हणत असला तर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.त्यानंतर सदस्य शालीकराम म्हस्के यांनी या प्रकरणावरून अध्यक्षांना धारेवर धरले. कार्योत्तर देण्यासाठी अध्यक्षांनी कोणता अधिकार वापरला. याचे उत्तर अध्यक्षांनी द्यावे. उत्तर नसेल तर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, अध्यक्षांचे काम असेल तर प्रशासन २४ तास उपलब्ध असते. परंतु, शेतकरी, सदस्यांची कामे असेल तर प्रशासन उपलब्ध नसल्याचेही ते म्हणाले. या सभेस सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.म्हस्के : मालकीच्या जागेवर दुकाने थाटलीजिल्हाभरात जेवढ्या जि.प.च्या मालकीच्या जागा आहे. त्यांना तारेचे कुंपण करा, अशी मागणी मागील दीड ते दोन वर्षांपासून मी आणि जयमंगल जाधव यांनी केली. परंतु, अद्यापही प्रशासनाने या जागांना कंपाऊंड केले नाही. त्यामुळे काही जागांवर तर दुकाने थाटली आहेत.भोकरदन येथे जि.प.च्या जागेवर अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्य शालीकराम म्हस्के यांनी केला.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदPoliticsराजकारणfundsनिधी