शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पाऊचची विल्हेवाट लावा, अन्यथा ५० हजारांचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:18 IST

पाणीपाऊचची विल्हेवाट न लावणा-या विक्रेत्यांना ५० हजारांचा दंड आकारून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

जालना : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ नुसार नगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या पातळ्यावंर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून पालिकेने आता नियमबाह्य प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबविण्यासाठी विक्रेत्यांना अल्टीमेटम दिले आहे. पाणीपाऊचची विल्हेवाट न लावणा-या विक्रेत्यांना ५० हजारांचा दंड आकारून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत मार्च २०१८ पर्यंत ४० शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी विविध निकष ठरविण्यात आले असून, त्यानुसार गुण दिले जाणार आहेत. निकषानुसार गुण मिळाल्यानंतर शासनाच्या विविध योजनांचे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळणार आहे. जालना शहरातही अशा पद्धतीच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी स्वच्छ सर्वेक्षणातील निकषांची पुर्तता करण्यासाठी शहर स्वच्छतेला प्राधान्य देताना दिसत आहेत. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल व मुख्याधिकारी संतोष खांडेकर प्रत्येक प्रभागात जाऊन स्वच्छतेचा आढावा घेत आहेत. बहुतांश भागात नाल्यांमध्ये पाणीपाऊचचा खच दिसून येत आहे. तसेच शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास नियमबाह्य वापर सुरू आहे. जुना जालना भागातील सरस्वती भुवन शाळेच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यामध्ये पाणीपाऊचचा खच पडला आहे. अशीच स्थिती भाग्यनगर परिसरात उड्डाणपुलास लागून असलेल्या नाल्यात पाहावयास मिळत आहे. काही हॉटेलचालक आपल्या हॉटेलमधील अन्न नाल्यांमध्ये टाकून अस्वच्छता निर्माण करत आहेत.तर मंगल कार्यालयांच्या बाहेर पाणीपाऊच व पत्रावळींचा खच पहावयास मिळत आहे. याला आळा घालण्यासाठी नगरपालिकेने महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचा उत्पादन व वापर अधिनियमांतर्गत नगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबविण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच पाणीपाऊचच्या माध्यमातून पाणी विक्री करणाºया उत्पादकांना पाणीपाऊच नाल्यांमध्ये पडणार नाहीत याची काळजी घेऊन त्याची अंतिम विल्हेवाट लागेपर्यंत जबाबदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तपासणीत नाल्यांमध्ये पाणीपाऊच आढळून आल्यास विक्रेत्याला पन्नास हजारांचा दंड आकारण्यात येणार असून, संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.