शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

धूलिवंदनाला रंगांचे नव्हे तर विचारांचे होते मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:42 IST

धुलिवंदन म्हणजे रंगाची उधळण करीत द्वेष, मत्सर इ. बाबींना तिलांजली देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने विचारांचे मंथन घडवून आणत समाजातील गूढ प्रश्नांची उकल करुन त्यावर सर्वानुमते उपाय शोधण्याची परंपरा पंधरा वर्षांपासून जपली आहे.

राजेश भिसे । विष्णू वाकडेलोकमत न्यूज नेटवर्कजालना : धुलिवंदन म्हणजे रंगाची उधळण करीत द्वेष, मत्सर इ. बाबींना तिलांजली देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने विचारांचे मंथन घडवून आणत समाजातील गूढ प्रश्नांची उकल करुन त्यावर सर्वानुमते उपाय शोधण्याची परंपरा पंधरा वर्षांपासून जपली आहे. यंदा या स्तुत्य उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे.कृषीरत्न विजयअण्णा बोराडे, कृषीभूषण भगवानराव काळे तसेच येथील विश्वस्त, कर्मचारी आणि येथे येणारा जाणकार शेतकरीवर्ग तसेच सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या विचार मंथनातून धूलिवंदनाच्या दिवशी आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन त्यावर उपस्थितांनी आपली मते आपली भूमिका मांडायची आणि यावरून निर्माण समस्येवर योग्य तो उपाय, तोडगा काढण्याचा स्वत:चा प्रयत्न नेमका कोणता याविषयीची जाण सर्वांना करून द्यायची. नैराश्याच्या गर्तेतून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग शोधण्याचा वेध येथे घेतला जातो. तो सर्वांच्या सहकार्याने वेळप्रसंगी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना योग्य निर्णयाप्रत आणून सोडणारा. कार्यक्रमास मराठवाड्यातून आपले विचार मांडण्यासाठी येथील विचार घेऊन जाण्यासाठी नागरिक येथे येतात. औरंगाबाद, परभणी, बीड येथून विचारवंतांची संख्यादेखील मोठी असते. हा उपक्रम संपूर्ण मराठवाड्यातून येणा-यांसाठी वैचारिक मेजवानी देणारा असल्याने याचा प्रसार दिवसेंदिवस अधिक प्रमाणात होत आहे.आरोग्य, शिक्षण, शेतकरी, शेती, स्वच्छता अशा बहुविध विषयांचा ठाव येथे घेण्यात आलेला आहे. ‘आम्ही सुधारु आमचे गाव’, ‘ग्रामीण भागातील विकासाची घडी विस्कटली जात आहे काय’ इ. गंभीर विषयांवर मंथन होऊन यातून अनेकांनी आपल्या जीवनात बदल करून घेतले. हेच या अनोख्या धूलिवंदन कार्यक्रमाचे यश म्हणता येईल. कृषी विज्ञान केंद्राने राबविलेला हा उपक्रम म्हणजे समाजक्रांतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.