शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धूलिवंदनाला रंगांचे नव्हे तर विचारांचे होते मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:42 IST

धुलिवंदन म्हणजे रंगाची उधळण करीत द्वेष, मत्सर इ. बाबींना तिलांजली देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने विचारांचे मंथन घडवून आणत समाजातील गूढ प्रश्नांची उकल करुन त्यावर सर्वानुमते उपाय शोधण्याची परंपरा पंधरा वर्षांपासून जपली आहे.

राजेश भिसे । विष्णू वाकडेलोकमत न्यूज नेटवर्कजालना : धुलिवंदन म्हणजे रंगाची उधळण करीत द्वेष, मत्सर इ. बाबींना तिलांजली देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने विचारांचे मंथन घडवून आणत समाजातील गूढ प्रश्नांची उकल करुन त्यावर सर्वानुमते उपाय शोधण्याची परंपरा पंधरा वर्षांपासून जपली आहे. यंदा या स्तुत्य उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे.कृषीरत्न विजयअण्णा बोराडे, कृषीभूषण भगवानराव काळे तसेच येथील विश्वस्त, कर्मचारी आणि येथे येणारा जाणकार शेतकरीवर्ग तसेच सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या विचार मंथनातून धूलिवंदनाच्या दिवशी आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन त्यावर उपस्थितांनी आपली मते आपली भूमिका मांडायची आणि यावरून निर्माण समस्येवर योग्य तो उपाय, तोडगा काढण्याचा स्वत:चा प्रयत्न नेमका कोणता याविषयीची जाण सर्वांना करून द्यायची. नैराश्याच्या गर्तेतून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग शोधण्याचा वेध येथे घेतला जातो. तो सर्वांच्या सहकार्याने वेळप्रसंगी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना योग्य निर्णयाप्रत आणून सोडणारा. कार्यक्रमास मराठवाड्यातून आपले विचार मांडण्यासाठी येथील विचार घेऊन जाण्यासाठी नागरिक येथे येतात. औरंगाबाद, परभणी, बीड येथून विचारवंतांची संख्यादेखील मोठी असते. हा उपक्रम संपूर्ण मराठवाड्यातून येणा-यांसाठी वैचारिक मेजवानी देणारा असल्याने याचा प्रसार दिवसेंदिवस अधिक प्रमाणात होत आहे.आरोग्य, शिक्षण, शेतकरी, शेती, स्वच्छता अशा बहुविध विषयांचा ठाव येथे घेण्यात आलेला आहे. ‘आम्ही सुधारु आमचे गाव’, ‘ग्रामीण भागातील विकासाची घडी विस्कटली जात आहे काय’ इ. गंभीर विषयांवर मंथन होऊन यातून अनेकांनी आपल्या जीवनात बदल करून घेतले. हेच या अनोख्या धूलिवंदन कार्यक्रमाचे यश म्हणता येईल. कृषी विज्ञान केंद्राने राबविलेला हा उपक्रम म्हणजे समाजक्रांतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.