शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

धरणात पाणी असूनही कालव्यातून पाणी सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

शेतक-यांचा आक्रोश : पाटबंधारे विभागाला निवेदन टेंभुर्णी- अकोलादेव येथील जिवरेखा धरण तुडूंब भरले असतानाही कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याने ...

शेतक-यांचा आक्रोश : पाटबंधारे विभागाला निवेदन

टेंभुर्णी- अकोलादेव येथील जिवरेखा धरण तुडूंब भरले असतानाही कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याने टेंभुर्णीसह परिसरातील पिके सुकू लागली आहे. यामुळे कालवा परिसरातील शेतक-यांचा रब्बी हंगामच धोक्यात आला असून, कालव्यातून त्वरीत पाणी सोडावे, असा आक्रोश शेतकरी करीत आहे. याबाबत टेंभुर्णी येथील शेतक-यांनी निवेदन पाटबंधारे विभागाला गुरुवारी दिले.

कालवा परिसरातील शाळूज्वारी, मका, गहू, हरभरा अशी सर्व पीके सध्या पाण्यावर आली असून, पहिल्या पाण्यानंतर कालव्यातून दुसरे पाणी सोडण्यास विलंब झाल्याने अनेक ठिकाणी सध्या पिकांनी माना टाकल्या आहेत. यामुळे धरणात पाणी असूनही डोळ्यादेखत पिके वाळताना पाहण्याची दुदैर्वी वेळ शेतकर्यांवर आली आहे. यामुळे शेतक-यांतून आक्रोश व्यक्त केला जात असून, त्वरीत पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे.

चौकट

यावर्षी जिवरेखा धरणातून पाणी सुटणार म्हणून कालवा परिसरातील सर्वच शेतकर्यांनी रब्बी हंगामाची पेरणी जोमात केली. कालव्यातून पहिले पाणी सुटून दीड महिण्याचा कालावधी उलटला तरी दुसरे पाणी न सुटल्याने आता पिके सुकू लागली आहे. पाटबंधारे विभाग गेट नादुरुस्तीचे कारण पुढे करीत असले तरी त्यांनी उभारी घेत असलेल्या पिकांच्या जीवाशी खेळू नये व शेतकर्यांचा अंत पाहू नये.

रंगनाथ जमधडे, शेतकरी, टेंभुर्णी.

चौकट-

धरणातून दुसरे पाणी सोडताना मंगळवारी गेटचा रॉड तुटल्याने तुर्त गेटचा भाग पूर्णत: दाबण्यात आला आहे. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गेट दुरुस्ती कठीण असली तरी दुरूस्तीसाठी कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहे. अन्य मार्गाने पाणी सोडता येवू शकते का त्याचाही विचार केला जात आहे. पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभाग सकारात्मक आहे.

माधुरी जुन्नारे, शाखा अभियंता, टेंभुर्णी

फोटो- शाखा अभियंता माधुरी जुन्नारे यांना निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव शिंदे, माजी सरपंच विष्णू जमधडे, रंगनाथ जमधडे आदी. दुसऱ्या छायाचित्रात पाण्याअभावी पिके अशी सुकू लागली आहे.