शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पाणी असूनही पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:33 IST

अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा गलथान कारभार : शेतकरी हैराण, वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.परतीच्या पावसाचा प्रवास संपल्याने पाऊस येईल, हि अशाही कोरडी पडली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीलाच आलेल्या जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. परंतु, पाऊस नसल्याने कपाशी, ऊस, तुर, मूग, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ खुंटली तर बहुतांश ठिकाणी ऊभी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. परतीच्या पावसाने ही दिलासा दिला नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जेमतेम राहिलेले पिकेही तीव्र उन्हामुळे वाळून केली. तूर व कपाशीचे पाते व फुले गळून पडत आहेत. शेतकºयांची पिके वाचावी यासाठी प्रशासनाने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला आठ दिवसापासून सोडले. परंतु, वारंवार वीज जात असल्याने या पाण्याचा उपयोग मात्र होताना दिसत नाही. महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार व नियोजनाचा अभाव असल्याने गेल्या आठ दिवसापासून एक तास हि सुरळीत वीज पुरवठा झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे कालव्यातून पाणी उपसा करणाºया शेतकºयांना एक गुंठा हि क्षेत्र या आठ दिवसात भिजवता आले नाही.कृषी पंपासाठी वीज पुरवठा करणाºया विद्युत वाहिन्यांमध्ये नेहमी बिघाड होऊन वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच अपुºया वीज दाबामुळे कृषी पंप चालत नसल्याने या परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.शेतकरी हैराणकालव्याला पाणी असूनही कृषी पंपाला वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पिके डोळ््यात देखत वाळून जात असल्याने शेतकºयांची अवस्था केविलवाणी झाली आहे.याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.जालना : लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची मागणीशेतकºयांना शेतीसाठी डाव्या कालव्याला पाणी सोडले खरे, पण विज गुल होत आहे. एका हाताने दिले, दुसºया हाताने नेले, अशी म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. इतर वेळी कुठल्याही कामावरून श्रेयबाजीसाठी पुढे येणारे राजकीय नेते शेतकºयांच्या या प्रश्रांवर गप्प का बसले? का कोणी वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु करण्यास पुढे येईना? असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरण