शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

पाणी असूनही पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:33 IST

अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा गलथान कारभार : शेतकरी हैराण, वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.परतीच्या पावसाचा प्रवास संपल्याने पाऊस येईल, हि अशाही कोरडी पडली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीलाच आलेल्या जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. परंतु, पाऊस नसल्याने कपाशी, ऊस, तुर, मूग, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ खुंटली तर बहुतांश ठिकाणी ऊभी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. परतीच्या पावसाने ही दिलासा दिला नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जेमतेम राहिलेले पिकेही तीव्र उन्हामुळे वाळून केली. तूर व कपाशीचे पाते व फुले गळून पडत आहेत. शेतकºयांची पिके वाचावी यासाठी प्रशासनाने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला आठ दिवसापासून सोडले. परंतु, वारंवार वीज जात असल्याने या पाण्याचा उपयोग मात्र होताना दिसत नाही. महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार व नियोजनाचा अभाव असल्याने गेल्या आठ दिवसापासून एक तास हि सुरळीत वीज पुरवठा झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे कालव्यातून पाणी उपसा करणाºया शेतकºयांना एक गुंठा हि क्षेत्र या आठ दिवसात भिजवता आले नाही.कृषी पंपासाठी वीज पुरवठा करणाºया विद्युत वाहिन्यांमध्ये नेहमी बिघाड होऊन वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच अपुºया वीज दाबामुळे कृषी पंप चालत नसल्याने या परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.शेतकरी हैराणकालव्याला पाणी असूनही कृषी पंपाला वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पिके डोळ््यात देखत वाळून जात असल्याने शेतकºयांची अवस्था केविलवाणी झाली आहे.याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.जालना : लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची मागणीशेतकºयांना शेतीसाठी डाव्या कालव्याला पाणी सोडले खरे, पण विज गुल होत आहे. एका हाताने दिले, दुसºया हाताने नेले, अशी म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. इतर वेळी कुठल्याही कामावरून श्रेयबाजीसाठी पुढे येणारे राजकीय नेते शेतकºयांच्या या प्रश्रांवर गप्प का बसले? का कोणी वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु करण्यास पुढे येईना? असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरण