शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

ठेवीदारांनी रांगा लावून काढल्या ठेवी; वसुली नाममात्रमुळे मंठा अर्बन बँक धोक्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 19:38 IST

महिनाभरापूर्वीपासून ही बँक संकटात सापडणार असल्याची कुणकुण ठेवीदारांना लागली होती.

ठळक मुद्देया बँकेत एकूण ८० कोटी रुपयांच्या ठेवी होत्याकर्ज जवळपास ७० कोटी रुपये वाटप केले

जालना : ठेवींच्या तुलनेत भरमसाठ कर्जवाटप केले, तसेच त्याच्या वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने २१ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली मंठा अर्बन बँक संकटात सापडली आहे. या बँकेवर आता रिझर्व्ह बँकेने अनेक निर्बंध घातल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मंठा अर्बन बँकेची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली. प्रकाश देशमुख यांनी मंठा अर्बन बँकेची स्थापना केली होती. 

मंठ्यासह परिसरात या बँकेने अल्पावधीच ठेवीदार, तसेच व्यापारी, उद्योजकांचा विश्वास संपादन केला होता. या बँकेच्या मंठा शहरासह सेवली, जालना, चंदनझिरा येथे चार शाखा आहेत. या बँकेत एकूण ८० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या; परंतु महिनाभरापूर्वीपासून ही बँक संकटात सापडणार असल्याची कुणकुण ठेवीदारांना लागली होती. त्यामुळे ठेवीदारांनी रांगा लावून आपल्या ठेवी काढून घेतल्या. ठेवी नसल्याने आणि कर्जाची वसुली नगण्य असल्याने ही बँक अडचणीत आली. काही ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास अडचणी निर्मण झाल्याने एकच खळबळ उडाली. मध्यंतरी मंठा येथे सभासदांनी ही बँक बंद पाडून मोठे आंदोलन केले होते. 

यासंदर्भात काही ठेवीदार, तसेच सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या बँकेचे विशेष लेखा परीक्षण विभागाकडून ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. हे ऑडिट सध्या सुरू आहे. असे असले तरी, गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेनेदेखील या बँकेस आपले व्यवहार सुधारण्याचा सल्ला, तसेच मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली होती. असे असतानाही या बँकेच्या संचालकांनी पाहिजे तेवढे गंभीरतेने घेतले नाही. यामुळे आता थेट रिझर्व्ह बँकेनेच हस्तक्षेप करून बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले आहेत.

या बँकेने ठेवी ८० कोटी असताना कर्ज जवळपास ७० कोटी रुपये वाटप केले, तसेच हे कर्ज वाटप करताना त्याच्या वसुलीकडे पाहिजे तेवढे लक्ष न दिल्याने बँकेचा तोटा वाढत गेला, तसेच बँक डबघाईला आली. रिझर्व्ह बँकेने जे निर्देश   दिले आहेत, त्यात बँक आता नवीन ठेवीदारांच्या ठेवी स्वीकारणार नाही. कर्ज वाटपाचा अधिकार गोठविण्यात आला असून, बँकेची मालमत्ता विकू शकत नाही. नवीन करारदेखील बँक करू शकणार नाही. हे बंधन आगामी सहा महिन्यांसाठी लागू करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने १७ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे. असे असले तरी या बँकेचा परवाना रद्द होणार नसून, बँक त्यांचे नियमितचे व्यवहार मात्र सुरळीत ठेवू शकते, असेही स्पष्ट केले आहे.

प्रशासक अथवा प्रशासकीय मंडळ येणार n मंठा अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने बंधन घातले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकार निबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, आम्ही या बँकेचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठवून ते जे निर्देश देतील त्याचे पालन केले जाईल. n विशेष म्हणजे या बँकेवर तातडीने प्रशासक अथवा प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याबाबतचा आमचा प्रस्ताव राहणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :bankबँकfundsनिधीJalanaजालना