शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

मंठ्यातील ३५ गावांत पाणीटंचाई, टँकरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:56 IST

मंठा तालुक्यात ३५ गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून, पाणी टंचाई निवारण करण्यासाठी १० गावाच्या ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यात ३५ गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून, पाणी टंचाई निवारण करण्यासाठी १० गावाच्या ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली आहे. तर २५ गावातील पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. तालुक्यात सध्या विहिरी, तलाव, बोअरचे पाणी आटत असल्याने अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची ओरड होत आहे. टंचाईग्रस्त गावात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.मंठा तालुका डोंगराळ असल्याने अनेक गावात माणसाबरोबरच जनवरांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तालुक्यातील ८ गावे व २ वाड्यांच्या ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे टँकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिका-यांकडे केली आहे. त्यामध्ये शिवणगिरी, लिंबखेडा, दहिफळ खंदारे, बेलोरा, बेलोरा तांडा, पांगरा गडदे, नानसी, गेवराई, किर्ला, किर्ला तांडा या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील २५ गावातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हाधिका-यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याचे पं.स. पाणी पुरवठा विभागाचे एस.एस. पैठणकर यांनी सांगितले. या अंतर्गत विहीर दुरूस्ती, आडवे बोअर, गाळ काढणे आदी कामे होणार आहेत. यामध्ये आर्डा खारी, हेलस, माळकिनी, पांगरी बु., शिरपूर, अंभुरा शेळके, वाघाळा, किर्ला, वझर सरकटे, पांगरी गोसावी, गुळखंड तांडा, वाटूर तांडा, धोंडी पिंपळगाव, तळणी, गुळखंड, दुधा, पांगरीबुद्रूक, केंधळी, बरबडा, पिंपरखेडा खराबे आदींचा समावेश असल्याचे सभापती म्हस्के म्हणाल्या.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक