शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
4
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
5
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
6
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
8
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
9
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
10
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
11
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
12
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
13
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
14
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
15
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
16
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
17
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
18
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
19
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
20
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

कालव्यातून पिकांना पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST

टेंभुर्णी : अकोलादेव येथील जीवरेखा धरणातील मुख्य कालव्याचे गेट नादुरुस्त झाल्याने सध्या हे गेट पूर्णत: दाबण्यात आले आहे. सध्या ...

टेंभुर्णी : अकोलादेव येथील जीवरेखा धरणातील मुख्य कालव्याचे गेट नादुरुस्त झाल्याने सध्या हे गेट पूर्णत: दाबण्यात आले आहे. सध्या कालवा परिसरातील रब्बी पिके पाण्यावर आली असताना हे गेट नादुरुस्त झाल्याने कालव्यातून पाणी केव्हा सुटणार, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पहिले पाणी सुटून आता दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे दुसरे पाणी लवकर सोडावे, अशी मागणी टेंभुर्णीसह परिसरातील शेतकरी करीत आहेत.

जाफराबाद तालुक्यातील ६.८८ दशलक्षघमी क्षमतेचे सर्वात मोठे धरण असलेल्या जीवरेखा धरणातून १७.६ किलोमीटर लांबीचा कालवा काढण्यात आला आहे. या कालव्यावर टेंभुर्णी, अकोलादेव, गणेशपूर, पापळ, गोंधनखेडा, सावंगी परिसरातील जवळपास १२९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या परिसरातील सर्व शेतकरी रब्बी हंगामासाठी कालव्याच्या पाण्यावर विसंबून असतात. यावर्षी धरण तुडुंब भरल्याने रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यात दीड महिन्यापूर्वी पहिले पाणी सुटल्याने त्या पाण्यावर रब्बी पिकांनी चांगली उभारी घेतली आहे. आता या पिकांना पाण्याची तीव्र गरज असताना ऐन वेळेवर गेट नादुरुस्त झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तातडीने दुरुस्ती करावी

पाटबंधारे विभागाने या गेटची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे. दुरुस्तीनंतर रब्बी हंगामासाठी तीन दिवसांच्या आत पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे, संजय सावंत, आमेर चाऊस, गजानन जाधव, मनोहर जाधव, विठ्ठल सपकाळ, मनोहर मुनेमानिक, ज्ञानेश्वर खांडेभराड, मनोज सावंत, श्याम खोत, शंकर खोत आदींनी केली आहे.