शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातून पिकांना पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST

टेंभुर्णी : अकोलादेव येथील जीवरेखा धरणातील मुख्य कालव्याचे गेट नादुरुस्त झाल्याने सध्या हे गेट पूर्णत: दाबण्यात आले आहे. सध्या ...

टेंभुर्णी : अकोलादेव येथील जीवरेखा धरणातील मुख्य कालव्याचे गेट नादुरुस्त झाल्याने सध्या हे गेट पूर्णत: दाबण्यात आले आहे. सध्या कालवा परिसरातील रब्बी पिके पाण्यावर आली असताना हे गेट नादुरुस्त झाल्याने कालव्यातून पाणी केव्हा सुटणार, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पहिले पाणी सुटून आता दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे दुसरे पाणी लवकर सोडावे, अशी मागणी टेंभुर्णीसह परिसरातील शेतकरी करीत आहेत.

जाफराबाद तालुक्यातील ६.८८ दशलक्षघमी क्षमतेचे सर्वात मोठे धरण असलेल्या जीवरेखा धरणातून १७.६ किलोमीटर लांबीचा कालवा काढण्यात आला आहे. या कालव्यावर टेंभुर्णी, अकोलादेव, गणेशपूर, पापळ, गोंधनखेडा, सावंगी परिसरातील जवळपास १२९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या परिसरातील सर्व शेतकरी रब्बी हंगामासाठी कालव्याच्या पाण्यावर विसंबून असतात. यावर्षी धरण तुडुंब भरल्याने रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यात दीड महिन्यापूर्वी पहिले पाणी सुटल्याने त्या पाण्यावर रब्बी पिकांनी चांगली उभारी घेतली आहे. आता या पिकांना पाण्याची तीव्र गरज असताना ऐन वेळेवर गेट नादुरुस्त झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तातडीने दुरुस्ती करावी

पाटबंधारे विभागाने या गेटची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे. दुरुस्तीनंतर रब्बी हंगामासाठी तीन दिवसांच्या आत पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे, संजय सावंत, आमेर चाऊस, गजानन जाधव, मनोहर जाधव, विठ्ठल सपकाळ, मनोहर मुनेमानिक, ज्ञानेश्वर खांडेभराड, मनोज सावंत, श्याम खोत, शंकर खोत आदींनी केली आहे.