शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

कोटीचे लक्ष्य निर्धारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:14 IST

शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे. जिल्ह्यात तब्बल १ कोटी ५ लाख रोपांची लागवड होणार असून, यासाठी शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.वृक्षतोडीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलत वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. जालना जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. परंतू हे प्रमाण केवळ १.२९ टक्के एवढेच आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी कसोसीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने जिल्ह्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाकडून जिल्ह्याला १ कोटी ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सध्य करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनिकरण, रेशीम विभाग, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस यंत्रणेसह सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत नियोजन करण्यात आले आहे.वृक्षलागवड आणि संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वनविभागाच्या जिल्ह्यात २२ रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये २८ लाख रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीत कोठे टँकरद्वारे तर कोठे उपलब्ध स्त्रोतातून पाणी देऊन ही रोपे जगविण्यात आली आहेत. निम, चिंच, बांबूसह इतर विविध प्रजातीची रोपे तयार आहेत. उद्दिष्ट पूर्तीसाठी लागणारी ५ लाख रोपे वगळता इतर रोपांचे सर्वसामान्यांना वाटप केले जाणार आहे. संस्था, संघटना, शाळांसह इतरांकडून येणा-या मागणीनुसार वनविभागाकडून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. तर इतर विभागांकडूनही वृक्षारोपण मोहिमेची जोरदारतयारी करण्यात आलेली आहे.वनरक्षकांसह वनमजूर राहणार कार्यरतवनविभागाला जिल्ह्यातील वनक्षेत्रात ५ लाख रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर वनविभागाकडे २८ लाख रोपे तयार आहेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार रोपांची लागवड करण्यासाठी १३ वनरक्षक, ४० वनमजुरांसह त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील मजुरांची मदत घेतली जाणार आहे.ग्रामपंचायतीला होणार ३ हजार रोपांचा पुरवठाजिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस ३ हजार २०० रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकच्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कन्या वनसमृद्धी योजनाही जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.इतर विभागही सक्रियवृक्षारोपण मोहिमेसाठी वनविभागाने २८ लाख रोपे तयार ठेवली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने जवळपास ५० लाख, रेशीम विभागाने जवळपास २५ लाख रोपे तयार ठेवली आहेत. तर इतर शासकीय विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांमध्येही लागवडीसाठी रोपे तयार ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागenvironmentवातावरणNatureनिसर्ग