शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कोटीचे लक्ष्य निर्धारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:14 IST

शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे. जिल्ह्यात तब्बल १ कोटी ५ लाख रोपांची लागवड होणार असून, यासाठी शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.वृक्षतोडीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलत वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. जालना जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. परंतू हे प्रमाण केवळ १.२९ टक्के एवढेच आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी कसोसीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने जिल्ह्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाकडून जिल्ह्याला १ कोटी ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सध्य करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनिकरण, रेशीम विभाग, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस यंत्रणेसह सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत नियोजन करण्यात आले आहे.वृक्षलागवड आणि संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वनविभागाच्या जिल्ह्यात २२ रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये २८ लाख रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीत कोठे टँकरद्वारे तर कोठे उपलब्ध स्त्रोतातून पाणी देऊन ही रोपे जगविण्यात आली आहेत. निम, चिंच, बांबूसह इतर विविध प्रजातीची रोपे तयार आहेत. उद्दिष्ट पूर्तीसाठी लागणारी ५ लाख रोपे वगळता इतर रोपांचे सर्वसामान्यांना वाटप केले जाणार आहे. संस्था, संघटना, शाळांसह इतरांकडून येणा-या मागणीनुसार वनविभागाकडून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. तर इतर विभागांकडूनही वृक्षारोपण मोहिमेची जोरदारतयारी करण्यात आलेली आहे.वनरक्षकांसह वनमजूर राहणार कार्यरतवनविभागाला जिल्ह्यातील वनक्षेत्रात ५ लाख रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर वनविभागाकडे २८ लाख रोपे तयार आहेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार रोपांची लागवड करण्यासाठी १३ वनरक्षक, ४० वनमजुरांसह त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील मजुरांची मदत घेतली जाणार आहे.ग्रामपंचायतीला होणार ३ हजार रोपांचा पुरवठाजिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस ३ हजार २०० रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकच्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कन्या वनसमृद्धी योजनाही जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.इतर विभागही सक्रियवृक्षारोपण मोहिमेसाठी वनविभागाने २८ लाख रोपे तयार ठेवली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने जवळपास ५० लाख, रेशीम विभागाने जवळपास २५ लाख रोपे तयार ठेवली आहेत. तर इतर शासकीय विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांमध्येही लागवडीसाठी रोपे तयार ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागenvironmentवातावरणNatureनिसर्ग