शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोटीचे लक्ष्य निर्धारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:14 IST

शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे. जिल्ह्यात तब्बल १ कोटी ५ लाख रोपांची लागवड होणार असून, यासाठी शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.वृक्षतोडीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलत वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. जालना जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. परंतू हे प्रमाण केवळ १.२९ टक्के एवढेच आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी कसोसीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने जिल्ह्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाकडून जिल्ह्याला १ कोटी ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सध्य करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनिकरण, रेशीम विभाग, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस यंत्रणेसह सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत नियोजन करण्यात आले आहे.वृक्षलागवड आणि संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वनविभागाच्या जिल्ह्यात २२ रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये २८ लाख रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीत कोठे टँकरद्वारे तर कोठे उपलब्ध स्त्रोतातून पाणी देऊन ही रोपे जगविण्यात आली आहेत. निम, चिंच, बांबूसह इतर विविध प्रजातीची रोपे तयार आहेत. उद्दिष्ट पूर्तीसाठी लागणारी ५ लाख रोपे वगळता इतर रोपांचे सर्वसामान्यांना वाटप केले जाणार आहे. संस्था, संघटना, शाळांसह इतरांकडून येणा-या मागणीनुसार वनविभागाकडून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. तर इतर विभागांकडूनही वृक्षारोपण मोहिमेची जोरदारतयारी करण्यात आलेली आहे.वनरक्षकांसह वनमजूर राहणार कार्यरतवनविभागाला जिल्ह्यातील वनक्षेत्रात ५ लाख रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर वनविभागाकडे २८ लाख रोपे तयार आहेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार रोपांची लागवड करण्यासाठी १३ वनरक्षक, ४० वनमजुरांसह त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील मजुरांची मदत घेतली जाणार आहे.ग्रामपंचायतीला होणार ३ हजार रोपांचा पुरवठाजिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस ३ हजार २०० रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकच्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कन्या वनसमृद्धी योजनाही जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.इतर विभागही सक्रियवृक्षारोपण मोहिमेसाठी वनविभागाने २८ लाख रोपे तयार ठेवली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने जवळपास ५० लाख, रेशीम विभागाने जवळपास २५ लाख रोपे तयार ठेवली आहेत. तर इतर शासकीय विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांमध्येही लागवडीसाठी रोपे तयार ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागenvironmentवातावरणNatureनिसर्ग