शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

समाजबांधवांच्या भावना जाणून घेतल्यावर निर्णय- सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:52 IST

समाज बांधवांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच आपण आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती अपक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समाज बांधवांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच आपण आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती अपक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.येथील नॅशनल महाविद्यालयात आ. सत्तार यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाज बांधवाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते म्हणाले की, आजही आपण नेते म्हणून माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच मानतो. परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचा गंभीर आरोपही सत्तार यांनी यावेळी केला. औरंगाबादेत आपण अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे, ते कसे असे विचारले असता, ते आपल्या जिल्ह्यातील असून, त्यांचे आणि आपले पारिवारिक संबंध आहेत. त्यामुळेच आपण त्यांना औरंगाबादेत निवडून आणण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला पाठिंब्याचे काय असे विचारले असता, जालना लोकसभा मतदारसंघात कोणाला मदत करायची हे अद्याप ठरले नाही. त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण हा समाजाचा मेळावा आणि चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सत्तार म्हणाले.यावेळी त्यांच्या सोबत अब्दुल रशीद यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाAbdul Sattarअब्दुल सत्तार