शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:02 IST

कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथे घडली.शंकर सर्जेराव तळेकर (१९ रा. चांधई एक्को ता. भोकरदन) असे मयत युवकाचे नाव आहे. शंकर तळेकर यांचे कुटूंब गेल्या अनेक वर्षांपासून शेतात घर करून वास्तव्यास आहे. शंकर हा शनिवारी सकाळी कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. शेतातील विद्युत पंप सुरू करीत असताना अचानक विजेचा धक्का बसला. यामध्ये शंकर दूरवर फेकला गेला. काही वेळातच तेथे आलेल्या नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली. नातेवाईकांनी जखमी शंकर तळेकर याला तातडीने उपचारासाठी जालना येथील रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजूर पोलीस चौकीचे जमादार प्रताप चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका शेतकरी कुटुंबातील कर्त्या युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला आहे. महावितरणने या घटनेचा पंचनामा करावा, संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू