शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मरण स्वस्त झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

दीपक ढोले जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात ...

दीपक ढोले

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे या काळात अपघात कमी होईल, असे वाटले होते. परंतु, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत २०२०मध्ये महामार्गावर झालेल्या १५६ अपघातात सर्वाधिक ९४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांचा जीव घेणाऱ्या या महामार्गांना मृत्यूमार्ग म्हटले, तर वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षभरात तीन दिवसात एकाला अपघातात जीव गमवावा लागला आहे.

सुरक्षित प्रवास, सुरक्षित रस्ता ठेवण्याची जबाबदारी पालिका, पोलिसांसह वाहनचालकांचीदेखील आहे. दुर्दैवाने हे घटक आपली जबाबदारी घेण्यास तयार होत नाहीत. याचा परिपाक म्हणून जीवघेण्या अपघातांची मालिका सहजतेने कमी होताना दिसत नाही. जालना जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत जीवघेणे, गंभीर, तसेच किरकोळ स्वरूपाचे एकूण १४६ अपघात झाले. यातील ८७ जीवघेण्या अपघातांमध्ये ८७ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. रस्ता अपघातात सरासरी तीन दिवसाला एका नागरिकाचा मृत्यू झाला. ८७ अपघातात ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ६९ अपघातांमध्ये ९३ व्यक्तिंना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. याशिवाय कोणतीही दुखापत न झालेल्या अपघातांची संख्या १०० इतकी आहे. या वर्षात जवळपास ३० टक्के व्यक्ती रस्त्याने चालताना अथवा रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांचे बळी ठरले. दोन वाहनांचा अपघात होणे ही वेगळी बाब आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या, रस्ता ओलांडत असलेल्या, रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तिंना भरधाव वाहनांनी धडक देणे आणि त्यात त्या व्यक्तिचा हकनाक जीव जाणे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.

का होतात अपघात ?

मरण ही न चुकणारी बाब आहे. मात्र, अवेळी आणि रस्त्यावर असा मृत्यू येणे यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते? वाहनांचा स्पीड, तसेच हेल्मेट, सीट बेल्ट वापराकडे होणारे दुर्लक्ष याचा थेट परिणाम अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर होतो आहे. या वर्षात मोटारसायकल, मोपेड अथवा स्कूटर्सचा अपघात होऊन अनेकांचा बळी गेला.

आकडेवारीवर नजर

वर्ष मयत

२०१८ ८३

२०१९ ८६

२०२० ९४