शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मरण स्वस्त झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

दीपक ढोले जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात ...

दीपक ढोले

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे या काळात अपघात कमी होईल, असे वाटले होते. परंतु, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत २०२०मध्ये महामार्गावर झालेल्या १५६ अपघातात सर्वाधिक ९४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांचा जीव घेणाऱ्या या महामार्गांना मृत्यूमार्ग म्हटले, तर वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षभरात तीन दिवसात एकाला अपघातात जीव गमवावा लागला आहे.

सुरक्षित प्रवास, सुरक्षित रस्ता ठेवण्याची जबाबदारी पालिका, पोलिसांसह वाहनचालकांचीदेखील आहे. दुर्दैवाने हे घटक आपली जबाबदारी घेण्यास तयार होत नाहीत. याचा परिपाक म्हणून जीवघेण्या अपघातांची मालिका सहजतेने कमी होताना दिसत नाही. जालना जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत जीवघेणे, गंभीर, तसेच किरकोळ स्वरूपाचे एकूण १४६ अपघात झाले. यातील ८७ जीवघेण्या अपघातांमध्ये ८७ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. रस्ता अपघातात सरासरी तीन दिवसाला एका नागरिकाचा मृत्यू झाला. ८७ अपघातात ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ६९ अपघातांमध्ये ९३ व्यक्तिंना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. याशिवाय कोणतीही दुखापत न झालेल्या अपघातांची संख्या १०० इतकी आहे. या वर्षात जवळपास ३० टक्के व्यक्ती रस्त्याने चालताना अथवा रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांचे बळी ठरले. दोन वाहनांचा अपघात होणे ही वेगळी बाब आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या, रस्ता ओलांडत असलेल्या, रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तिंना भरधाव वाहनांनी धडक देणे आणि त्यात त्या व्यक्तिचा हकनाक जीव जाणे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.

का होतात अपघात ?

मरण ही न चुकणारी बाब आहे. मात्र, अवेळी आणि रस्त्यावर असा मृत्यू येणे यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते? वाहनांचा स्पीड, तसेच हेल्मेट, सीट बेल्ट वापराकडे होणारे दुर्लक्ष याचा थेट परिणाम अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर होतो आहे. या वर्षात मोटारसायकल, मोपेड अथवा स्कूटर्सचा अपघात होऊन अनेकांचा बळी गेला.

आकडेवारीवर नजर

वर्ष मयत

२०१८ ८३

२०१९ ८६

२०२० ९४