शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

मरण स्वस्त झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

दीपक ढोले जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात ...

दीपक ढोले

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे या काळात अपघात कमी होईल, असे वाटले होते. परंतु, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत २०२०मध्ये महामार्गावर झालेल्या १५६ अपघातात सर्वाधिक ९४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांचा जीव घेणाऱ्या या महामार्गांना मृत्यूमार्ग म्हटले, तर वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षभरात तीन दिवसात एकाला अपघातात जीव गमवावा लागला आहे.

सुरक्षित प्रवास, सुरक्षित रस्ता ठेवण्याची जबाबदारी पालिका, पोलिसांसह वाहनचालकांचीदेखील आहे. दुर्दैवाने हे घटक आपली जबाबदारी घेण्यास तयार होत नाहीत. याचा परिपाक म्हणून जीवघेण्या अपघातांची मालिका सहजतेने कमी होताना दिसत नाही. जालना जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत जीवघेणे, गंभीर, तसेच किरकोळ स्वरूपाचे एकूण १४६ अपघात झाले. यातील ८७ जीवघेण्या अपघातांमध्ये ८७ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. रस्ता अपघातात सरासरी तीन दिवसाला एका नागरिकाचा मृत्यू झाला. ८७ अपघातात ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ६९ अपघातांमध्ये ९३ व्यक्तिंना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. याशिवाय कोणतीही दुखापत न झालेल्या अपघातांची संख्या १०० इतकी आहे. या वर्षात जवळपास ३० टक्के व्यक्ती रस्त्याने चालताना अथवा रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांचे बळी ठरले. दोन वाहनांचा अपघात होणे ही वेगळी बाब आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या, रस्ता ओलांडत असलेल्या, रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तिंना भरधाव वाहनांनी धडक देणे आणि त्यात त्या व्यक्तिचा हकनाक जीव जाणे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.

का होतात अपघात ?

मरण ही न चुकणारी बाब आहे. मात्र, अवेळी आणि रस्त्यावर असा मृत्यू येणे यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते? वाहनांचा स्पीड, तसेच हेल्मेट, सीट बेल्ट वापराकडे होणारे दुर्लक्ष याचा थेट परिणाम अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर होतो आहे. या वर्षात मोटारसायकल, मोपेड अथवा स्कूटर्सचा अपघात होऊन अनेकांचा बळी गेला.

आकडेवारीवर नजर

वर्ष मयत

२०१८ ८३

२०१९ ८६

२०२० ९४