शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हातपाय बांधून मृतदेह फेकला गोदावरी पात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:34 IST

परतूर तालुक्यातील गंगासावंगी येथे अनोळखी व्यक्तीचा खून करून हातपाय बांधून मृतदेह दगडाच्या साह्याने गोदावरी नदीत फेकून दिला. शनिवारी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : परतूर तालुक्यातील गंगासावंगी येथे अनोळखी व्यक्तीचा खून करून हातपाय बांधून मृतदेह दगडाच्या साह्याने गोदावरी नदीत फेकून दिला. शनिवारी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला.गंगासावंगी शिवारातील आष्टी-माजलगाव रस्त्यावरील पुलाजवळ गोदावरी नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, जमादार अनंत नागरगोजे, गोपीनाथ कांदे हे कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहोचले. गोदावरी पात्रात साधारणत: चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा तरंगत असलेला मृतदेह पोलिसांनी गावकºयांच्या मदतीने पाण्याबाहेर काढला. मृतदेह पूर्णपणे कुजला होता. त्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाºयांना घटनास्थळी बोलवून घेऊन जागेवरच शवविच्छेदन केले. मृतदेहावर गावकºयांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.अधिक माहिती देताना सपोनि इज्जपवार यांनी सांगितले की, मृत व्यक्तीचा कुठेतरी दुसºया ठिकाणी गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संशयितांनी सुताच्या दोरीच्या साह्याने मृतदेहाचे हातपाय बांधून त्यास दगडाच्या साह्याने नदीत फेकले असावे. मृत व्यक्तीच्या अंगावर अंगावर पांढरा शर्ट व काळी पॅन्ट असून, याबाबत कोणाला माहिती असल्यास आष्टी पोलिसांशी संपर्क साधावा. या प्रकरणी जमादार अनंत नागरगोजे यांच्या फियार्दी वरून आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि विनोद इज्जपवार करत आहेत.