शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

दानवे विरुद्ध औताडे लढत रंगणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:20 IST

जालना लोकसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विद्यमान खा. रावसाहेब दानवेंना भाजपने उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसकडून २०१४ च्या निवडणुकीत दानवेंना जबरदस्त टक्कर देणाऱ्या विलास औताडे यांच्या नावावर दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरा खलबले सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विद्यमान खा. रावसाहेब दानवेंना भाजपने उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसकडून २०१४ च्या निवडणुकीत दानवेंना जबरदस्त टक्कर देणाऱ्या विलास औताडे यांच्या नावावर दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरा खलबले सुरू होती. औताडेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याने दानवे विरूद्ध औताडे अशी लढत रंगणार आहे.खा. रावसाहेब दानवे यांची उमेदवारी दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून त्यांच्या विरूद्ध कोण येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ती आता संपली असून, काँग्रेसच्या महाराष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे आणि माजी सभापती भीमराव डोंगरे यांची नावे हायकमांडकडे गेली होती. परंतु, हायकमांडने औताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक गोटातून समजते.जालना लोकसभा मतदार संघात गेल्या २१ वर्षापासून काँग्रेसला आपले खाते उघडता आले नाही. १९९६ आणि १९९८ मध्ये उत्तमसिंग पवार यांनी बाजी मारली होती. तर १९९९ पासून खासदार दानवेंचेच या मतदारसंघावर वर्चस्व कायम राहिले आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी खासदार दानवेंनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पाच वर्षात भाजपने येन-केन प्रकारे सत्तेची समीकरणे जुळवून शिवसेनेपेक्षा राज्यात आपले वर्चस्व सिध्द करून मोठा भाऊ होण्याचा मान मिळविला.जालना लोकसभा मतदार संघाचा विचार करता केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने रावसाहेब दानवेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून बरेच विचारमंथन करण्यात आले. दानवेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला गेला. परंतु, माजी आ. कल्याण काळे आणि सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे औताडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.या निवडणुकीत दानवेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेसमधील आपसातील मतभेद दूर ठेवून एकत्र आल्यास ही निवडणूक दानवेंसाठी चुरशीची ठरू शकते. त्यामुळे सर्व जिल्ह्याचे लक्ष जालन्याकडे लागले आहे.बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्षभाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसहेब दानवेंनी शेतकऱ्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या मुद्यावरून त्यांना टक्कर देण्याचे आव्हान अपक्ष आ. बच्चू कडू यांनी वर्षभरापूर्वीच दिले होते. त्या दृष्टीने त्यांनी संघर्ष यात्रा काढून रण तापवण्याचा प्रयत्न केला होता. प्रहार पक्षाकडून ते दानवेंना आव्हान देणार असून मंगळवारी जालन्यात येत आहेत. शकुंतला मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पदाधिकारी साईनाथ चिन्नादोरे यांनी दिली. कडू काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस