शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दानवे विरुद्ध औताडे लढत रंगणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:20 IST

जालना लोकसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विद्यमान खा. रावसाहेब दानवेंना भाजपने उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसकडून २०१४ च्या निवडणुकीत दानवेंना जबरदस्त टक्कर देणाऱ्या विलास औताडे यांच्या नावावर दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरा खलबले सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विद्यमान खा. रावसाहेब दानवेंना भाजपने उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसकडून २०१४ च्या निवडणुकीत दानवेंना जबरदस्त टक्कर देणाऱ्या विलास औताडे यांच्या नावावर दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरा खलबले सुरू होती. औताडेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याने दानवे विरूद्ध औताडे अशी लढत रंगणार आहे.खा. रावसाहेब दानवे यांची उमेदवारी दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून त्यांच्या विरूद्ध कोण येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ती आता संपली असून, काँग्रेसच्या महाराष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे आणि माजी सभापती भीमराव डोंगरे यांची नावे हायकमांडकडे गेली होती. परंतु, हायकमांडने औताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक गोटातून समजते.जालना लोकसभा मतदार संघात गेल्या २१ वर्षापासून काँग्रेसला आपले खाते उघडता आले नाही. १९९६ आणि १९९८ मध्ये उत्तमसिंग पवार यांनी बाजी मारली होती. तर १९९९ पासून खासदार दानवेंचेच या मतदारसंघावर वर्चस्व कायम राहिले आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी खासदार दानवेंनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पाच वर्षात भाजपने येन-केन प्रकारे सत्तेची समीकरणे जुळवून शिवसेनेपेक्षा राज्यात आपले वर्चस्व सिध्द करून मोठा भाऊ होण्याचा मान मिळविला.जालना लोकसभा मतदार संघाचा विचार करता केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने रावसाहेब दानवेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून बरेच विचारमंथन करण्यात आले. दानवेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला गेला. परंतु, माजी आ. कल्याण काळे आणि सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे औताडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.या निवडणुकीत दानवेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेसमधील आपसातील मतभेद दूर ठेवून एकत्र आल्यास ही निवडणूक दानवेंसाठी चुरशीची ठरू शकते. त्यामुळे सर्व जिल्ह्याचे लक्ष जालन्याकडे लागले आहे.बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्षभाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसहेब दानवेंनी शेतकऱ्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या मुद्यावरून त्यांना टक्कर देण्याचे आव्हान अपक्ष आ. बच्चू कडू यांनी वर्षभरापूर्वीच दिले होते. त्या दृष्टीने त्यांनी संघर्ष यात्रा काढून रण तापवण्याचा प्रयत्न केला होता. प्रहार पक्षाकडून ते दानवेंना आव्हान देणार असून मंगळवारी जालन्यात येत आहेत. शकुंतला मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पदाधिकारी साईनाथ चिन्नादोरे यांनी दिली. कडू काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस