शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

दानवे- खोतकरांच्या आधी दंडबैठका; आता आणा-भाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:46 IST

एकमेकांविरुध्द दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालना लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापवले होते. परंतु नंतर ‘मातोश्री ’च्या आदेशानुसार खोतकरांनी तलवार म्यान केली. यानंतर हे दोन्ही नेते जाहीररीत्या प्रथमच बुधवारी एकमेकांसोबत दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकमेकांविरुध्द दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालना लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापवले होते. परंतु नंतर ‘मातोश्री ’च्या आदेशानुसार खोतकरांनी तलवार म्यान केली. यानंतर हे दोन्ही नेते जाहीररीत्या प्रथमच बुधवारी एकमेकांसोबत दिसले. त्यांनी दोस्ती निभावण्याच्या आणा- भाकाही घेतल्या. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचीही उपस्थिती यावेळी लक्ष वेधून घेत होती.प्रारंभी शिवसैनिकांची बैठक खोतकरांच्या निवासस्थानी तीन तास चालली. त्याच वेळेस भाजपची बैठक नगरसेवक भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नंतर दानवे खोतकरांच्या घरी गेले. प्रारंभी खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांची बंदव्दार अर्धा तास चर्चा झाली. नंतर तिन्ही नेत्यांनी बाहेर शिवसैनिकांसमोर येऊन ‘आतील’ काही घडामोडींची माहिती दिली. झाले गेले विसरून जाऊन यापुढे तरी दोन्ही पक्षांनी एकोप्याने काम करावे, असा त्यांचा एकंदरीत सूर होता. या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे भाजप- आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया या निमित्ताने उंचावल्या होत्या.हे तर जावा- जावांचे रुसवे फुगवे !दानवे आणि खोतकर यांचा वाद म्हणजे घरातील जावा-जावांचे वाद होते. मोठी जाऊ आणि तिचा नवरा हा घरातील कर्ता पुरूष असतो. तसे दानवे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे वागणे होते. साहजिकच लहान जाऊ अर्थात शिवसेना यामुळे मेटाकुटीस आली होती. ते थांबविण्याची गरज अंबेकर यांनी व्यक्त केली. खोतकर यांनी देखील अशीच री ओढली. दानवे यांनी यापुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असे होणार नाही, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर