शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दानवे, खोतकर बंधूची ‘डिनर डिप्लोमसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:10 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा संदर्भातील महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू आहेत. असे असतांनाच गुरूवारी रात्री शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथे जाऊन डिनर डिप्लोमसी केल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देचर्चेला उधाण : भेटीत राजकीय खलबते झाली नसल्याचे स्पष्टीकरण, राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क, चमत्काराची शक्यता

जालना/भोकरदन : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा संदर्भातील महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू आहेत. असे असतांनाच गुरूवारी रात्री शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथे जाऊन डिनर डिप्लोमसी केल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. सहा जानेवारीला जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.जालना जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात राहावी म्हणून भाजपने कंबर कसली आहे. तर काही दगाफटका होऊ नये म्हणून दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते सतर्क झाले असून, जवळपास सर्वच पक्षांचे सदस्य आता सहलीवर गेले आहेत. गुरूवारी महाविकास आघाडीच्या दुपारी झालेल्या बैठकीस अर्जुन खोतकर, अनिरूध्द खोतकर यांचीही उपस्थिती होती. या बैठकीस आ. राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, माजी आ, सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. शिवाजी चोथे, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ. निसार देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची दुपारी महाविकास आघाडीच्या बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला आहे. तर उपाध्यक्ष पदावरही त्यांचा दावा असून, चार सभापंतीमध्ये तीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक काँग्रेस अशी सभापती पदे घ्यावेत अशीही चर्चा झाली. परंतु या बद्दल अद्याप कुठलाच अंतिम निर्णय झाला नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.एकूणच भाजपचे सर्वात जास्त म्हणजे २२ सदस्य असतांनाही अडीच वर्षापूर्वी शिवसेनेने अचानक धोका देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संधान साधून अध्यक्षपदी अनिरूध्द खोतकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे यांची वर्णी लावली होती.ही सल आजही भाजपच्या म्हणजेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मनात कायम आहे. त्यातच लोकसभा निडणुकतही दानवे यांना अर्जुन खोतकरांनी मोठे आव्हान दिले होते. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मध्यस्ती करावी लागली होती.

भाजपकडे ३१ सदस्यदुसरीकडे भाजपने गुरूवारी रात्री काही सदस्यांना सहलीवर पाठवले होते. तर काही सदस्य शुक्रवारी दुपारी गेले. एका भाजपच्या सदस्याने सांगितले की, आमच्यासोबत एकूण ३१ सदस्य असून, सर्व सदस्य सहलीला गेले आहे. दरम्यान, जालना जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची सत्ता आहे.महाविकासआघाडीला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ६ जानेवारी रोजी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या सर्व सदस्यांची भोकरदन येथे बैठक बोलली होती. बंद दरवाज्या आड झालेल्या या बैठकीत काय चर्चा झाले हे कळू शकले नाही.

टॅग्स :Jalanaजालनाzpजिल्हा परिषदraosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर