शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

‘त्या’ खत कंपन्यांची कसून चौकशी व्हावी- दमानिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही मारत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, नांदेड येथील खत कंपनीच्या मालसह अन्य खत उत्पादन करणाºया कारखान्यांची कसून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाव्दारे केली.बुधवारी दमानिया या परतूर येथील न्यायालयीन कामासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. तसेच जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्याच आठवड्यात जालन्यातील दोन खत उत्पादन करणा-या कंपन्यांमध्ये बोगस साहित्याचा वापर करून सेंद्रिय खत असल्याचे भासवले जात होते.या संदर्भात कृषी विभागानेच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित कंपन्यांच्या प्रयोगशाळांचे तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या सर्व खतांचे सँपल घेऊन त्याची उच्चस्तरीय तपासणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी त्यांनी राजलक्ष्मी, राधागोविंद, उज्वल, किसान शक्ती, उज्ज्वल बिलेट, सूरजवर्षा इंडट्री आदी कंपन्यांची यादी निवेदनासोबत दिली आहे. या सर्व कंपन्यांवर नांदेड येथील एक बडा उद्योजक संचालक म्हणून कार्य करतो. असेही त्यांनी सांगितले. एकूणच जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या ज्या जमिनी राजकीय वर्तुळातील जवळच्या व्यक्तींनी खरेदी केल्या आहेत. त्याची चौकशी व्हावी असेही दमानिया यांनी यावेळी सांगितले. त्या जमिनींचे व्यवहार रद्द करून त्या मूळ मालकांना देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. परतूर येथील बागेश्वरी कारखान्याच्या व्यवस्थापनावर दमानिया यांनी काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप केले केले होते, त्या आरोपा बाबत दमानिया यांना बागेश्वरीच्या प्रशासनाने न्यायालयात ओढले आहे. या संदर्भातील खटल्याची सुनावणी गुरूवारी होती, त्यासाठी त्या परतूर येथे आल्या होत्या. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १७ जुलैला होणार आहे. यावेळी कैलास फुलारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रanjali damaniaअंजली दमानियाfraudधोकेबाजी