शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पदाधिकारी, ग्रामस्थांच्या प्रयत्नातून दहिफळ गाव कोरोनामुक्त, तीन महिन्यांपासून रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

जालना : सर्वसामान्यांची झोप उडविणाऱ्या कोरोनाला गावातून हद्दपार करण्यात दहिफळ (ता. जालना) ग्रामस्थांनी यश मिळविले आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि ...

जालना : सर्वसामान्यांची झोप उडविणाऱ्या कोरोनाला गावातून हद्दपार करण्यात दहिफळ (ता. जालना) ग्रामस्थांनी यश मिळविले आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मागील तीन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण आढळलेला नाही.

१३०० लोकसंख्येच्या दहिफळ गावात गत दीड - दोन वर्षात २० जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. गावात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सरपंच मीरा मोहन राठोड यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोना विरूद्धचा लढा उभा केला. गाव स्वच्छता, नियमित मास्कचा वापर करण्यासह लसीकरणावर भर देण्यात आला. मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध समित्यांच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे आजवर तब्बल ९२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यापुढेही गावात कोरोनाचे रुग्ण आढळू नयेत, यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत दक्षता घेत आहेत.

तालुक्यात प्रथम

दहिफळ गावातील ग्रामपंचायत आणि सर्वपक्षीय मंडळींनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाला कोरोनामुक्त केले आहे.

ग्रामस्थांचे प्रयत्न आणि प्रशासनाने दिलेली साथ यामुळे दहिफळ गाव कोरोनामुक्तीत तालुक्यात अव्वल आले आहे. तालुक्यात प्रथम

ग्रामपंचायतीने असे केले प्रयत्न

इतर जिल्ह्यातून, शहरातून येणाऱ्यांची तपासणी, गावात स्वतंत्र अलगीकरण केंद्र, बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध आणि उपचार यावर भर देण्यात आला.

कोरोना लढ्यात महत्त्वाचा विषय असलेल्या लसीकरणाची जनजागृती केली. आजवर गावातील ९२ टक्के नागरिकांचे लसीकरणही पूर्ण झाले आहे.

गाव कोरोनामुक्त करण्यात ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. गावातील सर्वपक्षीयांनी एकत्रित केलेले प्रयत्न आणि प्रशासनाची साथ यामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- मीरा मोहन राठोड, सरपंच

कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांसह सर्वपक्षीयांचेही परिश्रम मोठे आहेत. शिवाय प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून केलेल्या कामामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे.

-विजय राठोड, ग्रामसेवक

गावातील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यात आले. गरजेनुसार संबंधितांवर उपचार करण्यात आले. शिवाय लसीकरण वेळेत व्हावे, याकडेही आरोग्य विभागाचा अधिक कल राहिला आहे.

-डॉ. अतुल साटेवाड, वैद्यकीय अधिकारी