शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वीज वितरण कंपनीला ग्राहक मंचाचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:29 IST

वीज नियामक आयोगाने निर्णय देताना स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची ठरवत संबंधित कंपनीला दिलासा दिला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील नवजीवन हायब्रीड सीडस् कंपनीत वीज मीटरच्या मुद्यावरून वीज वितरणने चुकीची कारवाई केली होती. विरोधात नवनजीवन सीडस्चे संचालक रमेश पवार यांनी याची तक्रार थेट वीज नियामक आयोगाकडे केली होती. त्यावर सुनावणी होऊन वीज नियामक आयोगाने निर्णय देताना स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची ठरवत संबंधित कंपनीला दिलासा दिला आहे.या माहिती अशी की, महावितरणच्या जालना विभगातर्फे बियाणे उत्पादन कंपनीला वीज नियामक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे वीज बिल दिले नसल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी आयोगाकडे वीज कायद्यातील कलम १४२ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. आयोगाकडे वीज वितरण कडून वीज बिलात दुरूस्ती करण्यास उशीर झाला असल्याचे मान्य केले. त्याच बरोबर सुधारित बिल देण्याची तयारी दर्शविली. आयोगाने ९ डिसेंबर २०१६ रोजी मंजूर केलेल्या आदेशात ग्राहक मंचाच्या आदेशाचे पालन करण्यात यावे तसेच झालेले नुकसान संबंधित अधिकाºयाकडून वसूल करावे असे निर्देश दिले.जालना विभागाने आयोगाचा व मुख्य अभियंत्यांचा आदेश असताना देखील आम्ही केलेली वीज बिल दुरूस्ती योग्य असल्याचे सांगून वीज पुरवठा करण्यात आला. या विरोधात पवार यांनी आयोगाकडे तक्रार केली. आयोगाकडील सुनावणीच्या वेळेस महाविरणतर्फे वीजबिल थकबाकी व भरणा याचे चुकीचे आकडे सादर करून आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. आयोगाने २६ आॅक्टोबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशात हे प्रकरण वीज ग्राहक मंचाकडे पाठवून जालना विभागाकडून देण्यात आलेल्या बिलाची सुधारित तपासणी करण्याचे आदेश दिले होते.औरंगाबाद येथील ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे हे प्रकरण दाखल झाल्यावर मंचाने आयोजित केलेल्या दोन सुनावणीस जालन्याकडून कोणताही अधिकारी हजर नव्हता. सुनावणीस हजर न राहिल्याने संबंधित जबाबदार अधिका-यास ५०० रूपयांचा दंड भरण्याचा आदेशही दिला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत महावितरणकडून तीन वेळेस वेगवेगळे प्रस्ताव दाखल केले. या तिन्हींचा अभ्यास केल्यावर ग्राहकाची बाजू मांडतांना अ‍ॅड. हेमंत कापडिया यांनी हे प्रस्ताव चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. मे २०१३ ते मार्च २०१८ या कालावधीत औद्योगिक दराने येणारे बिल त्यांनी मंचासमोर दाखल केले होते. यावर ग्राहक मंचाने ११ डिसेंबरला दिलेल्या आदेशात महावितरणकडून ३० मार्च २०१८ रोजी वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करताना दाखवलेली एक लाख ६ हजार रूपये ही रक्कम चुकीची असून, ग्राहकाकडे केवळ दोन हजार ५७० रूपये थकबाकी असल्याचा निष्कर्ष काढून हा निकाल वीज नियामक आयोगास कळविला आहे. ही कारवाई चेतन वाडे यांनी केली होती.दरम्यानच्या काळात आदेशाचे पालन न केल्यामुळे वीजबिल वाणिज्य दराने आकारण्यात येत असल्यामुळे वीज बिलाची थकबाकी रक्कम तीन लाख ४९ हजार रूपये एवढी दाखवण्यात येत होती. आयोगाने दिलेल्या आदेशा नंतर महावितरणतर्फे वीज बिलातून दोन लाख ५८ हजार रूपये कमी करून ग्राहकास एक लाख ६ हजार ७१० रूपयांचे बिल देण्यात आले. महावितरणतर्फे करण्यात आलेली ही वीजबिल दुरूस्ती मान्य नसल्याचे ग्राहकाने वीज वितरणला कळविले.त्यानंतरही वितरणकडून त्यांचा वीजपुरवठा २०१८ मध्ये आधी तात्पुरता आणि नंतर ३० मार्च रोजी कायमस्वरूपी खंडित केला. तसेच मीटरही पूर्वसूचना न देता काढून नेले. या कारवाई विरूध्द ग्राहकाने वितरण कंपनीच्या औरंगाबाद येथील मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्य अभियंत्यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून बिलात दुरूस्ती करून व ग्राहकास योग्य बिल देण्याचे जालना येथील कार्यालयास आदेश दिले होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCourtन्यायालय