शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

वीज वितरण कंपनीला ग्राहक मंचाचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:29 IST

वीज नियामक आयोगाने निर्णय देताना स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची ठरवत संबंधित कंपनीला दिलासा दिला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील नवजीवन हायब्रीड सीडस् कंपनीत वीज मीटरच्या मुद्यावरून वीज वितरणने चुकीची कारवाई केली होती. विरोधात नवनजीवन सीडस्चे संचालक रमेश पवार यांनी याची तक्रार थेट वीज नियामक आयोगाकडे केली होती. त्यावर सुनावणी होऊन वीज नियामक आयोगाने निर्णय देताना स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची ठरवत संबंधित कंपनीला दिलासा दिला आहे.या माहिती अशी की, महावितरणच्या जालना विभगातर्फे बियाणे उत्पादन कंपनीला वीज नियामक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे वीज बिल दिले नसल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी आयोगाकडे वीज कायद्यातील कलम १४२ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. आयोगाकडे वीज वितरण कडून वीज बिलात दुरूस्ती करण्यास उशीर झाला असल्याचे मान्य केले. त्याच बरोबर सुधारित बिल देण्याची तयारी दर्शविली. आयोगाने ९ डिसेंबर २०१६ रोजी मंजूर केलेल्या आदेशात ग्राहक मंचाच्या आदेशाचे पालन करण्यात यावे तसेच झालेले नुकसान संबंधित अधिकाºयाकडून वसूल करावे असे निर्देश दिले.जालना विभागाने आयोगाचा व मुख्य अभियंत्यांचा आदेश असताना देखील आम्ही केलेली वीज बिल दुरूस्ती योग्य असल्याचे सांगून वीज पुरवठा करण्यात आला. या विरोधात पवार यांनी आयोगाकडे तक्रार केली. आयोगाकडील सुनावणीच्या वेळेस महाविरणतर्फे वीजबिल थकबाकी व भरणा याचे चुकीचे आकडे सादर करून आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. आयोगाने २६ आॅक्टोबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशात हे प्रकरण वीज ग्राहक मंचाकडे पाठवून जालना विभागाकडून देण्यात आलेल्या बिलाची सुधारित तपासणी करण्याचे आदेश दिले होते.औरंगाबाद येथील ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे हे प्रकरण दाखल झाल्यावर मंचाने आयोजित केलेल्या दोन सुनावणीस जालन्याकडून कोणताही अधिकारी हजर नव्हता. सुनावणीस हजर न राहिल्याने संबंधित जबाबदार अधिका-यास ५०० रूपयांचा दंड भरण्याचा आदेशही दिला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत महावितरणकडून तीन वेळेस वेगवेगळे प्रस्ताव दाखल केले. या तिन्हींचा अभ्यास केल्यावर ग्राहकाची बाजू मांडतांना अ‍ॅड. हेमंत कापडिया यांनी हे प्रस्ताव चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. मे २०१३ ते मार्च २०१८ या कालावधीत औद्योगिक दराने येणारे बिल त्यांनी मंचासमोर दाखल केले होते. यावर ग्राहक मंचाने ११ डिसेंबरला दिलेल्या आदेशात महावितरणकडून ३० मार्च २०१८ रोजी वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करताना दाखवलेली एक लाख ६ हजार रूपये ही रक्कम चुकीची असून, ग्राहकाकडे केवळ दोन हजार ५७० रूपये थकबाकी असल्याचा निष्कर्ष काढून हा निकाल वीज नियामक आयोगास कळविला आहे. ही कारवाई चेतन वाडे यांनी केली होती.दरम्यानच्या काळात आदेशाचे पालन न केल्यामुळे वीजबिल वाणिज्य दराने आकारण्यात येत असल्यामुळे वीज बिलाची थकबाकी रक्कम तीन लाख ४९ हजार रूपये एवढी दाखवण्यात येत होती. आयोगाने दिलेल्या आदेशा नंतर महावितरणतर्फे वीज बिलातून दोन लाख ५८ हजार रूपये कमी करून ग्राहकास एक लाख ६ हजार ७१० रूपयांचे बिल देण्यात आले. महावितरणतर्फे करण्यात आलेली ही वीजबिल दुरूस्ती मान्य नसल्याचे ग्राहकाने वीज वितरणला कळविले.त्यानंतरही वितरणकडून त्यांचा वीजपुरवठा २०१८ मध्ये आधी तात्पुरता आणि नंतर ३० मार्च रोजी कायमस्वरूपी खंडित केला. तसेच मीटरही पूर्वसूचना न देता काढून नेले. या कारवाई विरूध्द ग्राहकाने वितरण कंपनीच्या औरंगाबाद येथील मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्य अभियंत्यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून बिलात दुरूस्ती करून व ग्राहकास योग्य बिल देण्याचे जालना येथील कार्यालयास आदेश दिले होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCourtन्यायालय