शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जालना जिल्ह्यात थंडीच्या लाटेत कोमेजली पिके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:28 IST

पाच दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरू, डाळिंबाच्या बागा अक्षरश: वाळल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरू, डाळिंबाच्या बागा अक्षरश: वाळल्या आहेत. तसेच ज्वारी, भोपळ््याच्या पिकासह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतक-यांना पुन्हा दुष्काळात तेरावा महिना आला आहे़तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील गजानन हरिभाऊ भुते, कृष्णा भुते, पांडुरंग काटोले, रवींद्र शिंंदे यांनी गेल्या पाच- सहा वर्षांमध्ये पेरूची फळबाग चांगली फुलविली होती. या फळबागेपासून त्यांची आर्थिक उन्नती सुद्धा झाली. यावर्षी त्यांनी शेततळ््यातील पाण्यावर फळबाग जोपासली. यामुळे पेरूचे उत्पादन चांगले भरभरून आले होते. परंतु, पेरूचा अर्धा हंगाम संपत आला असतानाच गेल्या चार- पाच दिवसांपासून तालुक्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे नागरीक सकाळी लवकर घराबाहेर पडत नाहीत. मात्र, या थंडीमुळे फळबागा वाळतील असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, एकट्या अवघडराव सावंगी या गावातील गजानन भुते यांच्या दहा एकर पेरूच्या बागेतील ३ एकर मधील पेरूची झाडे वाळली आहेत. या झाडांना पेरू सुद्धा लगडलेले आहेत. शिवाय पांडुरंग काटोले व रवींद्र शिंदे यांचे दोन एकर मधील पेरूची बाग वाळली आहे.या शेतकºयांनी मोठ्या परिश्रमाने पेरू व सीताफळाची बाग पिकवून या भागातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले होते. त्यामुळे या गावातील शेतकºयांनी सीताफळ व पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावर शेतक-यांनी ठिबक सिंचनावर भोपळ्याचे सीड्स प्लॉट लावले होते. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. भोपळ््याला काही ठिकाणी फुले व भोपळे लागले. पण, थंडीमुळे भोपळ््याचे पीक पूर्णपणे वाळले आहे. यात बोरगाव खडक येथील फकिरबा पार्वे, राजेंद्र पार्वे, गंगाधर व्यवहारे, रमेश पार्वे यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या बोरगाव खडकमध्ये एका कंपनीच्या भोपळ््याच्या सीड्सचे २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकºयांनी सांगितले आहे़पिंपळगाव सुतार, चांधई एक्को, राजूर, बाणेगाव, हसनाबाद या भागातील काही शेतक-यांनी शाळू ज्वारीची पेरणी केली होती. या ज्वारीला काही ठिकाणी कणसे लागली आहेत. मात्र, या थंडीमुळे ज्वारीचे पीक वाळले आहे.पिंपळगाव सुतार येथील शेतकरी राजू दानवे यांनी सांगितले की, दोन एकर क्षेत्रामध्ये ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, या थंडीमुळे पीक पूर्णपणे वाळले आहे. यामुळे आता केवळ ज्वारी पिकाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होईल.भोपळ्याचे पीक झाले उद्ध्वस्ततालुक्यातील हसणाबाद परिसरातील बोरगाव खडक, खडकी, बोरगाव, सिंरजगाव वाघ्रूळ, निमगाव, नळणी, जवखेडा, रजाळा, टाकळी, विटा या पूर्णा व गिरजा या नदी काठावर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी एका कंपनीकडून भोपळा पीकाचे सिड्सचे प्लॉट घेतले आहेत. थंडीमुळे या पिकाची अशी अवस्था झाली.भाजीपाला गारठलातालुक्यात काही ठिकाणी ठिंबक सिंंचनावर पाच दहा गुंठ्यांमध्ये वांगी, टॉमेटो, गवार, मेथीची भाजी, कारले, दोडके, मिरची इ. भाजीपाला शेतकºयांनी लावला होता. मात्र, थंडीमुळे हा भाजीपालाही गारठला आहे. यामुळे येणा-या काळात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे़हरभ-याचे पीक बहरलेया थंडीमुळे बहुतांश पिकांचे नुकसान झाले असले तरी ज्या शेतकºयांनी हरभरा गहू पिकाची लागवड केली आहे, अशा पिकांना या थंडीचा लाभ झाला आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनagricultureशेतीFarmerशेतकरी