शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

जालना जिल्ह्यात थंडीच्या लाटेत कोमेजली पिके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:28 IST

पाच दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरू, डाळिंबाच्या बागा अक्षरश: वाळल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरू, डाळिंबाच्या बागा अक्षरश: वाळल्या आहेत. तसेच ज्वारी, भोपळ््याच्या पिकासह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतक-यांना पुन्हा दुष्काळात तेरावा महिना आला आहे़तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील गजानन हरिभाऊ भुते, कृष्णा भुते, पांडुरंग काटोले, रवींद्र शिंंदे यांनी गेल्या पाच- सहा वर्षांमध्ये पेरूची फळबाग चांगली फुलविली होती. या फळबागेपासून त्यांची आर्थिक उन्नती सुद्धा झाली. यावर्षी त्यांनी शेततळ््यातील पाण्यावर फळबाग जोपासली. यामुळे पेरूचे उत्पादन चांगले भरभरून आले होते. परंतु, पेरूचा अर्धा हंगाम संपत आला असतानाच गेल्या चार- पाच दिवसांपासून तालुक्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे नागरीक सकाळी लवकर घराबाहेर पडत नाहीत. मात्र, या थंडीमुळे फळबागा वाळतील असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, एकट्या अवघडराव सावंगी या गावातील गजानन भुते यांच्या दहा एकर पेरूच्या बागेतील ३ एकर मधील पेरूची झाडे वाळली आहेत. या झाडांना पेरू सुद्धा लगडलेले आहेत. शिवाय पांडुरंग काटोले व रवींद्र शिंदे यांचे दोन एकर मधील पेरूची बाग वाळली आहे.या शेतकºयांनी मोठ्या परिश्रमाने पेरू व सीताफळाची बाग पिकवून या भागातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले होते. त्यामुळे या गावातील शेतकºयांनी सीताफळ व पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावर शेतक-यांनी ठिबक सिंचनावर भोपळ्याचे सीड्स प्लॉट लावले होते. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. भोपळ््याला काही ठिकाणी फुले व भोपळे लागले. पण, थंडीमुळे भोपळ््याचे पीक पूर्णपणे वाळले आहे. यात बोरगाव खडक येथील फकिरबा पार्वे, राजेंद्र पार्वे, गंगाधर व्यवहारे, रमेश पार्वे यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या बोरगाव खडकमध्ये एका कंपनीच्या भोपळ््याच्या सीड्सचे २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकºयांनी सांगितले आहे़पिंपळगाव सुतार, चांधई एक्को, राजूर, बाणेगाव, हसनाबाद या भागातील काही शेतक-यांनी शाळू ज्वारीची पेरणी केली होती. या ज्वारीला काही ठिकाणी कणसे लागली आहेत. मात्र, या थंडीमुळे ज्वारीचे पीक वाळले आहे.पिंपळगाव सुतार येथील शेतकरी राजू दानवे यांनी सांगितले की, दोन एकर क्षेत्रामध्ये ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, या थंडीमुळे पीक पूर्णपणे वाळले आहे. यामुळे आता केवळ ज्वारी पिकाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होईल.भोपळ्याचे पीक झाले उद्ध्वस्ततालुक्यातील हसणाबाद परिसरातील बोरगाव खडक, खडकी, बोरगाव, सिंरजगाव वाघ्रूळ, निमगाव, नळणी, जवखेडा, रजाळा, टाकळी, विटा या पूर्णा व गिरजा या नदी काठावर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी एका कंपनीकडून भोपळा पीकाचे सिड्सचे प्लॉट घेतले आहेत. थंडीमुळे या पिकाची अशी अवस्था झाली.भाजीपाला गारठलातालुक्यात काही ठिकाणी ठिंबक सिंंचनावर पाच दहा गुंठ्यांमध्ये वांगी, टॉमेटो, गवार, मेथीची भाजी, कारले, दोडके, मिरची इ. भाजीपाला शेतकºयांनी लावला होता. मात्र, थंडीमुळे हा भाजीपालाही गारठला आहे. यामुळे येणा-या काळात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे़हरभ-याचे पीक बहरलेया थंडीमुळे बहुतांश पिकांचे नुकसान झाले असले तरी ज्या शेतकºयांनी हरभरा गहू पिकाची लागवड केली आहे, अशा पिकांना या थंडीचा लाभ झाला आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनagricultureशेतीFarmerशेतकरी