शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

खरीप उत्पादन ५० टक्क्यांवर घसरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:56 IST

गेल्या तीन महिन्यात सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून, गेल्या २६ दिवसांपसून पावसाने हजेरी न लावल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीची वाढ खुंटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून, गेल्या २६ दिवसांपसून पावसाने हजेरी न लावल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीची वाढ खुंटली आहे. कोरवाडहू शेतकऱ्यांनी तर आता चांगल्या उत्पादनाच्या आशा सोडल्या आहेत. पाणीसाठ्याची स्थिती गंभीर असून, जिल्हाभरात पावसाळ््यातही १९ टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मध्यम लघु प्रकल्पही कोरडेठाक असल्याने जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन महिन्याचा कालावधी झाला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बरसल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात सोयाबीन व कापूस पीक करपू लागले आहेत. त्यातूनही तग धरुन उभ्या असलेल्या सोयाबीनमध्ये पाण्याअभावी दाणे भरण्यास अडचण येणार आहे. उडीद, मुगाच्या उत्पादनावर ३० टक्के घट होण्यात शक्यता आहे. जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ६६० हेक्टरवरील सोयाबीन व ३ लाख २ हजार ६५५ हेक्टरवरील कपाशी धोक्यात आली आहे. तसेच येणा-या काळात भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुकत चाललेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी एका निवेदना,ारे केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचाही इशारा दिला आहे.भर पावसाळ््यात १९ टॅकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात यावर्षी एक पाऊस सोडला तर अद्यापही मोठ्या पाऊस झाला नाही. परिणामी, भर पावसाळ््यात १९ टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक १६ टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात पाऊस न झाल्यास या टॅकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ११ गावे व २ वाड्यांमध्ये १६ टॅकर, परतूर तालुक्यातील १ गावामध्ये १ टॅकर, जाफराबाद तालुक्यातील १ गावात २ टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ४३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात भोकरदनमध्ये ३२ व जाफराबादमध्ये ११ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.प्रकल्पांनी गाठला तळजालना जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी या प्रकल्पांमध्ये ४२.८५ टक्के उपयुक्त पाणीसाठी होता. तो यंदा केवळ ८.८३ टक्के आहे. सात पैंकी दोन प्रकल्प जोत्याच्या पातळी खाली असून, ० ते २५ टक्के पाणीसाठा असलेले तीन प्रकल्प आहेत. तर २६ ते ५० टक्के यामध्ये केवळ एका प्रकल्पाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात ५७ लघु प्रकल्प असून, त्यामध्ये गेल्या वर्षी २०.१० टक्के पाणीसाठा होता. तो यंदा केवळ ४.७९ टक्के आहे. यावरुन दुष्काळाची परिस्थिती किती भायवह आहे हे स्पष्ट होते. ५७ लुघ प्रकल्पापैंकी ४४ प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली आहेत.जिल्ह्य१०० मि.मी ने पाऊस कमीजालना जिल्ह्यात सरसरी १७ सप्टेंबरपर्यंत अपेक्षित पाऊस हा ४९० मि.मी. होता. परंतु, आज घडीला ४७१.६० मि. मी. पाऊस पडला आहे. जो की, आजच्या सरासरीच्या तुलनेत १०० मि. मी. कमी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या २४ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली नसल्याची नोंद आहे.प्िििपकांचे पंचनामे करण्याची शेतकºयांची मागणीचंदनझिरा : जालना तालुक्यातील कारला, ममदाबाद, भुतेगाव, हातवन, वडीवाडी इ. भागांतील सोयाबीन, मका, तूर व कपाशीच्या पिकांनी माना टाकल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी राजू खरात, लक्ष्मण देशमुख, दत्तात्रय गोरे, प्रकाश भवर, कल्याण खरात, बबन जाधव, भाऊसाहेब खरात, कुंडलिक सरोदे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018agricultureशेती