शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:09 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.निवडणुकीच्या मतमोजणीसाठी ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी दिली. दरम्यान या संदर्भात रविवारी येथील सेंटमेरी शाळेत दुसरे प्रशिक्षण पार पडले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मतमोजणीसाठीची तयारी आणि ती कशी करावी, या संदर्भात माहिती दिली.यामध्ये एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असे एका टेबलमध्ये तीन कर्मचारी राहणार असून असे ८४ टेबल विधानसभानिहाय राहणार आहेत. पोस्टल बॅलेट मतांसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पाच व्हीव्हीपॅटच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे.एकूण जवळपास ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. या मतमोजणीसाठी ८४ टेबल मागे राजकीय पक्षांचे ८४ एजंटांना प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.निवडणूक निकालाच्या जवळपास २५ फे-या मतमोजणीच्या होतील अशी शक्यता रवींद्र बिनवडे यांनी व्यक्त केली. या प्रशिक्षण शिबीराला निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालjalna-pcजालनाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना