शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पाण्याच्या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:58 IST

महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुुरू असल्याने जायकवाडी योजनेची पाईपलाईन फुटल्याने जुना जालना भागाचा पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प झाला आहे. याच मुद्यावर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुुरू असल्याने जायकवाडी योजनेची पाईपलाईन फुटल्याने जुना जालना भागाचा पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प झाला आहे. याच मुद्यावर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांना महिन्याभरापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेच्या वतीने कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा का केला जात नाही, असा सवाल करत नगरसेवकांनी आयोजित न.प.च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला.नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सर्व सभापती, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह अधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक शहा आलम खान यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. महिन्याभरापासून जुना जालना भागाला पाणी नाही. पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगर परिषदेच्या वतीने पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आली नाही. घाणेवाडी तलावातून शहराला पाणीपुरवठा का करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर महावीर ढक्का यांनीही पाण्याचा मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर मुुख्याधिका-यांनी जायकवाडी योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्याचे सांगून आजपासून पाणीपुरवठा सुुरळीत होईल, असे सांगितले.स्वच्छता, वाढीव कर आकारणी, गळती, खातेप्रमुखांची गैरहजेरी इ. मुद्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच विषयपत्रिकेवरील १५ विषयांसह आयत्या वेळच्या दोन विषयांना मंजुरी देऊन सभेचा समारोप केला. नगरसेवक विष्णू पाचफुले, आरेफ खान, शेख शकील, फारूख तुंडीवाले, जयंत भोसले, अरूण मगरे, वैशाली जांगडे, रफिया बेगम, मीना घुुगे आदींनी प्रश्न मांडले. पिंटू रत्नपारखे यांनी केशव कानपुडेंचा मुद्दा उपस्थित करून धारेवर धरले.अधिकारी : कर्मचा-यांवर वचकच नाहीनगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे कार्यालयात नसल्यावर कोणातही अधिकारी कार्यालयात हजर राहत नाही. अधिकारी कामचुकारपणाही करतात. मुख्याधिका-यांचा अधिकारी व कर्मचा-यांवर वचकच राहिला नसल्याचे नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी सांगितले.याला उत्तर देताना मुख्याधिकारी म्हणाले की, जे अधिकारी गैरहजर राहतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.वाढीव कर आकारणीमुळे नागरिक हैराणनगर परिषदेच्या वतीने यावर्षी नागरिकांकडून वाढीव कर आकारणी करण्यात येत आहे. परंतु, यातही अधिकारी व कर्मचारी हात साफ करून घेत आहेत. गतवर्षी ७०० रूपयांचा कर असताना यावर्षी २ लाखांचा कर भरून घेतला जात आहे. कर कमी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीPoliticsराजकारण