शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:13 IST

दरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोनाचे परिणाम एकूणच संपूर्ण मानवी जीवनावर या - ना त्या कारणाने पडले आहेत. व्यापार, उद्योगा प्रमाणेच साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रही यामुळे भरडले गेले आहे. गर्दी न करणे हाच प्रभावी उपाय या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचा पर्याय आहे. त्यामुळे दरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे.जालन्यातील साहनी परिवाराकडून प्रसिध्द कवी राय हरिश्चंद्र साहनी उर्फ दु:खी यांच्या स्मरणार्थ राज्य काव्य पुरस्कार देऊन कवी, लेखकांना सन्मानित करण्यात येते. गेल्या २१ वर्षापासून देण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी देण्यात येत होता. तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजक विनित साहनी तसेच कवयित्री संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांनी दिली. आज पर्यंत महाराष्ट्रात अनेक नामवंत कवी, लेखक आणि चित्रकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या कवितेच्या पाडव्याच्या कार्यक्रमाची अल्पावधीतच राज्य पातळीवर एक स्वतंत्र ओळख निर्माण होऊन त्याला एक मानाचा सन्मान म्हणून गणले जाऊ लागले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच हा कार्यक्रम होईल असे साहनी यांनी सांगितले. जालन्यातील दुसरा एक महत्त्वाचा आणि तेवढाच लोकप्रिय झालेली चैत्रपालवी ही संगीत मैफल होय. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मैफिल पुढे ढकलण्यात आल्याची माहिती रूक्मिणी परिवाराचे सदस्य सुरेश मगरे यांनी दिली. या मैफिलीतही अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावून जालनेकर रसिकांची संगीताची भूक भागविली आहे. हा कार्यक्रम आम्ही यंदाही तेवढ्याच चांगल्या कलाकाराला निमंत्रित करून जोरदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते रद्द झाल्याने आमच्यासह जालनेकर रसिकांचाही हिरमोड झाला आहे.२० वर्षात दु:खी काव्य पुरस्काराचे हे आहेत मानकरीबलवंत धोंगडे, गणेश विसपुते, वृषाली किन्हाळकर, राम दुतोंडे, कैलास भाले, श्रीकांत देशमुख, फ.मुं. शिंदे, इंद्रजीत भालेराव, मनोज बोरगावकर, रामदास फुटाणे, राजेंद्र दास, प्रवीण बांधेकर, लोकनाथ यशवंत, भगवान देशमुख, अनुराधा पाटील, विष्णू सूर्या वाघ, अरूणा ढेरे, सुरेश सावंत आणि महेश केळुसकर, राजन गवस, सौमित्र (किशोर कदम) आदींचा यात समावेश आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि अव्याहत सुरू ठेवण्यासाठी जालना शहरातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच साहित्यप्रेमी, शायर यांची मदत झाल्यानेच हे शक्य झाल्याचे विनित साहनी म्हणाले.स्व. नवल सहानी यांच्या प्रेरणेतून हा कवितेचा पाडवा प्रारंभ झाला. त्यावेळी ‘उर्मी’ चे प्रा. जयराम खेडेकर, कवि संतोष जेधे यांच्यासह अन्य साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी हा उपक्रम पुढे नेला. सद्यस्थितीत विनित साहनी, कवयित्री संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांच्या मदतीने हा उपक्रम सुरू आहे.या राज्य काव्य पुरस्कारात अनेक महान चित्रकारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचाही यथोचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यामुळे हा कार्यक्रम शब्द आणि शिल्पांचा संगम म्हणून ओळखला गेला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक