शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

कोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:13 IST

दरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोनाचे परिणाम एकूणच संपूर्ण मानवी जीवनावर या - ना त्या कारणाने पडले आहेत. व्यापार, उद्योगा प्रमाणेच साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रही यामुळे भरडले गेले आहे. गर्दी न करणे हाच प्रभावी उपाय या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचा पर्याय आहे. त्यामुळे दरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे.जालन्यातील साहनी परिवाराकडून प्रसिध्द कवी राय हरिश्चंद्र साहनी उर्फ दु:खी यांच्या स्मरणार्थ राज्य काव्य पुरस्कार देऊन कवी, लेखकांना सन्मानित करण्यात येते. गेल्या २१ वर्षापासून देण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी देण्यात येत होता. तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजक विनित साहनी तसेच कवयित्री संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांनी दिली. आज पर्यंत महाराष्ट्रात अनेक नामवंत कवी, लेखक आणि चित्रकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या कवितेच्या पाडव्याच्या कार्यक्रमाची अल्पावधीतच राज्य पातळीवर एक स्वतंत्र ओळख निर्माण होऊन त्याला एक मानाचा सन्मान म्हणून गणले जाऊ लागले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच हा कार्यक्रम होईल असे साहनी यांनी सांगितले. जालन्यातील दुसरा एक महत्त्वाचा आणि तेवढाच लोकप्रिय झालेली चैत्रपालवी ही संगीत मैफल होय. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मैफिल पुढे ढकलण्यात आल्याची माहिती रूक्मिणी परिवाराचे सदस्य सुरेश मगरे यांनी दिली. या मैफिलीतही अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावून जालनेकर रसिकांची संगीताची भूक भागविली आहे. हा कार्यक्रम आम्ही यंदाही तेवढ्याच चांगल्या कलाकाराला निमंत्रित करून जोरदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते रद्द झाल्याने आमच्यासह जालनेकर रसिकांचाही हिरमोड झाला आहे.२० वर्षात दु:खी काव्य पुरस्काराचे हे आहेत मानकरीबलवंत धोंगडे, गणेश विसपुते, वृषाली किन्हाळकर, राम दुतोंडे, कैलास भाले, श्रीकांत देशमुख, फ.मुं. शिंदे, इंद्रजीत भालेराव, मनोज बोरगावकर, रामदास फुटाणे, राजेंद्र दास, प्रवीण बांधेकर, लोकनाथ यशवंत, भगवान देशमुख, अनुराधा पाटील, विष्णू सूर्या वाघ, अरूणा ढेरे, सुरेश सावंत आणि महेश केळुसकर, राजन गवस, सौमित्र (किशोर कदम) आदींचा यात समावेश आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि अव्याहत सुरू ठेवण्यासाठी जालना शहरातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच साहित्यप्रेमी, शायर यांची मदत झाल्यानेच हे शक्य झाल्याचे विनित साहनी म्हणाले.स्व. नवल सहानी यांच्या प्रेरणेतून हा कवितेचा पाडवा प्रारंभ झाला. त्यावेळी ‘उर्मी’ चे प्रा. जयराम खेडेकर, कवि संतोष जेधे यांच्यासह अन्य साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी हा उपक्रम पुढे नेला. सद्यस्थितीत विनित साहनी, कवयित्री संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांच्या मदतीने हा उपक्रम सुरू आहे.या राज्य काव्य पुरस्कारात अनेक महान चित्रकारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचाही यथोचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यामुळे हा कार्यक्रम शब्द आणि शिल्पांचा संगम म्हणून ओळखला गेला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक