शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

कोरोनाचा कहर सुरूच, जिल्ह्यात ५५२ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रूग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. तर बुधवारीच तब्बल ५५२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला ...

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रूग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. तर बुधवारीच तब्बल ५५२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात जालना शहरातील तब्बल ३६२ जणांचा समावेश आहे.

दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात बुधवारी रेकॉर्ड ब्रेक ५५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील तब्बल ३६२ जणांचा समावेश आहे. तर इंदेवाडी -१, बोरगाव -१, दादावाडी -३, राममूर्ती -६, बठण -२, नागेवाडी -१, कारला -१, निपाणी पोखरी -१, कवठी तांडा -१, पाथरवाला -१, माणेगाव -५, पाथ्रुड -१, निरखेडा -१,वाघ्रुळ -१, कडवंची -१, सिंधी काळेगाव -१, मजरेवाडी -३, साळेगाव -१, डुकरी पिंप्री -१, उटवद -१, रामनगर का-४, सावरगाव -१, भिलपुरी -१, सामनगाव -१, बापकळ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंठा शहर -२२, बेलोरा -१, पाटोदा -२, ढोकसाळ -१, पाडळी -१, तळणी -१, परतूर शहर -१, वाटूर येथील एकाला बाधा झाली आहे. घनसावंगी शहर -३, राणी उंचेगाव -१, माहेर जवळा -१, पानेवाडी -१, तीर्थपुरी -१, मंगू जळगाव -१, कुंभार पिंपळगाव -१, जांब समर्थ येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. अंबड शहर -१२, नालेवाडी -१, सुखापुरी -१, गोंदी -२, जामखेड -१, मठ पिंपळगाव -१, हस्तपोखरी -१, पागिरवाडी -१, बदनापूर शहर -४, चिकनगाव -१, शेलगाव -१, काजळा -५, ढोकसाळ -१, सिंधी पिंपळगाव -१, दाभाडी -१, चनेगाव -१, असोला -१, महिको येथील आठ जणांना बाधा झाली आहे. जाफराबाद शहर -५, सोनखेडा -१, डोणगाव -१, सातेफळ -१, जानेफळ -१, अकोला येथील एकाला लागण झाली आहे. भोकरदन शहर -९, वरुड -१, राजूर -२, चिंचोली -१, पिंपळगाव रेणुका -२, माळशेंद्रा -१, पारध -१, मसरुळ -१, धावडा -१, वालसावंगी -१, खाडगाव -२, जळगाव सपकाळ -६, वाढोणा -१, केदारखेडा -३, जामखेडा ठोंबरे -२, नळणी -१, चांदई येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर औरंगाबाद -१, बीड -२, बुलढाणा -१३, परभणी -१, अमरावती -१ असे आरटीपीसीआरद्वारे एकूण ३४९ जणांचा तर अँटीजेन तपासणीद्वारे २०३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

१४१५ सक्रिय रूग्ण

कोविड रूग्णालयात सध्या १४१५ सक्रिय रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १९ हजार ६८५ वर गेली असून, त्यातील ४१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रूग्णालयातील उपचारानंतर १७ हजार ८५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

विलगीकरणात १४२ जण

जिल्ह्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात १४२ जणांना ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर बी ब्लॉकमध्ये २७, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर सी ब्लॉक ७७, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर डी ब्लॉकमध्ये २५, घनसावंगी येथील केजीबीव्हीमध्ये १३ जणांना ठेवण्यात आले आहे.