शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कोरोनातही सराफा बाजारात धनवर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:13 IST

कोरोनाने संकटात सापडलेले उद्योग दिवाळीच्या तेजाने जणू काही उजळून निघाले असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.

ठळक मुद्देदागिन्यांसह महालक्ष्मीच्या प्रतिमेला मागणी

जालना : कोरोनाचे मळभ दूर झाल्याचे चित्र शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी दिसून आले. धनत्रयोदशीला सोने  आणि चांदी हे मौल्यवान धातू खरेदीला अनन्यसाधारण महत्व हिंदू संस्कृतीत आहे. हे  महत्व लक्षात घेऊन जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये कोट्यवधी रूपयांची सोने खरेदीची उलाढाल झाल्याचे दिसून आले. 

दिवाळीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून बाजार गर्दीने फुलला आहे. यात नवीन कपडे, पूजेचे साहित्य, तसेच सोने, चांदी, रेफ्रीजरेटर, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, यासह मोबाईलच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. विविध दुकानदारांनी तसेच उत्पादक कंपन्यांनी खरेदीवर भरमसाठ डिस्काऊंट  दिल्याने देखील खरेदीचा उत्साह बाजारात दिसून आला. कोरोनाने संकटात सापडलेले उद्योग दिवाळीच्या तेजाने जणू काही उजळून निघाले असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. दरम्यान शुक्रवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम  ५१ हजार २०० एवढे होते. तर चांदीचे दर हे ६४ हजार प्रति किलो एवढे होते. धनत्रयोदशीला एक ग्रॅम का हाेईना सोने खरेदी करण्यास मोठे महत्व आहे.

आजच्या दिवशी मौल्यवान वस्तुंची खरेदी केल्यास वर्षभर चणचण जाणवत नाही, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आज सहा ते सात महिने शुकशुकाट असलेल्या सराफा बाजारात पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र होते. गाडी पार्किंग करण्यासाठी अनेकांची कसरत झाली. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास  हिरावल्याने मोठे संकट आले होते. परंतु सरकारने जाहीर केलेली मदत खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करून का होईना सोने, चांदी खरेदीचा मुहूर्त साधला. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेला कापूस शेतकऱ्यांच्या घरात पोहचला आहे. परंतु सध्या कापूस खरेदी करण्यात येत नसल्याने तो घरातच पडून आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, वाहन बाजारात तेजी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी मुहूर्त असतो. तो मुहूर्त यंदाही नागरिकांनी साधला आहे. सोन्या- चांदीच्या दरात दिवाळीच्या तोंडावर घसरण झाल्याने देखील खरेदीत वाढ झाल्याची माहिती सुखदेव ज्वेलर्सचे ओंकार गिंदोडिया यांनी सांगितले. वाहन खरेदीकडे अनेकांचा कल आहे. अनेकांनी वाहनांची बुकिंग केली असली तरी ते नवीन कार, दुचाकी पाडव्याच्या दिवशी घरी नेणार असल्याचे कमिटमेंट केले असल्याची माहिती अंबरीश बजाजचे संचालक रघुनंदन लाहोटी यांनी सांगितले. 

घर खरेदीला प्राधान्य राज्य सरकारने मुद्रांक शुल्क कमी केले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये घर-खरेदी विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. तसेच नवीन घरांच्या प्रकारात बंगलोज, वन, टू. बीएचके फ्लॅट खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. विविध बँका तसेच वित्तीय संस्थांनी गृह प्रकल्पांसाठी त्यांच्या व्याजदरात कपात केली असून, होमलोन एका दिवसात मंजूर होत असल्याने ग्राहकांचा कल नवीन घर खरेदीकडे आहे. - अभय पाथरवालकर, संचालक, विठ्ठला गृहप्रकल्प, जालना

टॅग्स :JalanaजालनाMarketबाजार