शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींचे संधीत रुपांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:23 IST

नोकरी, पॅकेजच्या मागे न लागता आलेल्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योजक व्हा आणि देशाच्या समृद्धीत भर घालण्याचे महत्वाचे कार्य करा, असे आवाहन उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जगाच्या बाजारपेठेत पूर्वी आपल्या देशाचा वाटा ३३ टक्के म्हणजे एक तृतीयांश एवढा होता. आजघडीला मात्र आपल्या देशाचा वाटा घसरून केवळ ३ टक्केच राहिला आहे. त्यामुळे बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, हे आता आपल्याला केवळ म्हणून चालणार नाही तर सर्वांनी आपल्या कृतीतून ते सिध्द करून दाखविण्याची गरज आहे. नोकरी, पॅकेजच्या मागे न लागता आलेल्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योजक व्हा आणि देशाच्या समृद्धीत भर घालण्याचे महत्वाचे कार्य करा, असे आवाहन औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी केले.कै. दत्ताजी भाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ समारोहानिमित्त गुरुवारी कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलाच्या वतीने अंबड येथील पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात उद्योजक प्रसाद कोकीळ यांचे ‘उद्योजगतेकडून संपन्नतेकडे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भाला तर प्रमुख पाहुणे म्हणून द्वारकादास मंत्री यांच्यासह अ‍ॅड. आर. आर. कुलकर्णी, केदार मंत्री, तुकाराम तौर, दीपकठाकूर, द्वारकादास जाधव, रमेश शहाणे, गंगाधर वराडे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना कोकीळ म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत अमेरिका, चीन, युरोप आदी देशांचा वाटा वाढत चालला आहे. मात्र आपल्या देशाची होत असलेली घसरण आपण रोखू शकलो नाही. कारण आपली मानसिकता कमकुवत झाली आहे. आपण पूर्वी बलवान, सुखी, समृद्ध, संपन्न होतो, हेच विसरून गेलो आहे. आपल्या देव-देवता सोन्याने सजलेल्या संपन्न असतांना तसेच आपल्या संस्कृतीत संपन्नता भिनलेली असतानाही आपण संपन्नतेकडे वाटचाल करताना एवढी कच का खात आहोत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :businessव्यवसायMIDCएमआयडीसीSocialसामाजिक