शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अडचणींचे संधीत रुपांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:23 IST

नोकरी, पॅकेजच्या मागे न लागता आलेल्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योजक व्हा आणि देशाच्या समृद्धीत भर घालण्याचे महत्वाचे कार्य करा, असे आवाहन उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जगाच्या बाजारपेठेत पूर्वी आपल्या देशाचा वाटा ३३ टक्के म्हणजे एक तृतीयांश एवढा होता. आजघडीला मात्र आपल्या देशाचा वाटा घसरून केवळ ३ टक्केच राहिला आहे. त्यामुळे बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, हे आता आपल्याला केवळ म्हणून चालणार नाही तर सर्वांनी आपल्या कृतीतून ते सिध्द करून दाखविण्याची गरज आहे. नोकरी, पॅकेजच्या मागे न लागता आलेल्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योजक व्हा आणि देशाच्या समृद्धीत भर घालण्याचे महत्वाचे कार्य करा, असे आवाहन औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी केले.कै. दत्ताजी भाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ समारोहानिमित्त गुरुवारी कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलाच्या वतीने अंबड येथील पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात उद्योजक प्रसाद कोकीळ यांचे ‘उद्योजगतेकडून संपन्नतेकडे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भाला तर प्रमुख पाहुणे म्हणून द्वारकादास मंत्री यांच्यासह अ‍ॅड. आर. आर. कुलकर्णी, केदार मंत्री, तुकाराम तौर, दीपकठाकूर, द्वारकादास जाधव, रमेश शहाणे, गंगाधर वराडे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना कोकीळ म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत अमेरिका, चीन, युरोप आदी देशांचा वाटा वाढत चालला आहे. मात्र आपल्या देशाची होत असलेली घसरण आपण रोखू शकलो नाही. कारण आपली मानसिकता कमकुवत झाली आहे. आपण पूर्वी बलवान, सुखी, समृद्ध, संपन्न होतो, हेच विसरून गेलो आहे. आपल्या देव-देवता सोन्याने सजलेल्या संपन्न असतांना तसेच आपल्या संस्कृतीत संपन्नता भिनलेली असतानाही आपण संपन्नतेकडे वाटचाल करताना एवढी कच का खात आहोत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :businessव्यवसायMIDCएमआयडीसीSocialसामाजिक